शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार, बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही: राहुल नार्वेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 08:02 IST

जोपर्यत सरकारकडे बहुमत आहे, तोपर्यत सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे बाहेर कोण काय बोलतात, त्याला काही अर्थ नाही.

सावंतवाडी :

जोपर्यत सरकारकडे बहुमत आहे, तोपर्यत सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे बाहेर कोण काय बोलतात, त्याला काही अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयही विधानसभेचे महत्त्व अबाधित ठेवूनच निर्णय घेईल, अशी मला आशा आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होईल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

नार्वेकर हे सावंतवाडीतील घरी खासगी दौऱ्यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयात होणार नाही. तो निर्णय विधानसभेतच होईल  कारण प्रत्येक व्यवस्थेने कोणते निर्णय घ्यावे, हे ठरलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या जमिनी वर्षोनुवर्षे उद्योजकांना दिल्या आहेत, पण तेथे उद्योग उभारण्यात आले नाहीत. अशा या जमिनींबाबत सरकारने काही निर्णय घेतला पाहिजे. कारण सर्वसामान्य जनतेच्या जमिनी या विकासकामासाठी दिल्या आहेत. मग त्या जमिनी तशाच ठेवणे योग्य नाही. त्या जमिनीवर उद्योगधंदे आले पाहिजेत असे मत ही त्यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा आहे. पण या जिल्ह्याचा तसा विकास झाला पाहिजे. येथील किनार्‍यावर सोयी-सुविधा निर्माण होण्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी मी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकर