शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

५४ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पाच महिने लटकली; कायद्यात स्पष्टता नसल्याने विधानसभा अध्यक्षांकडील प्रकरण रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 11:51 IST

याप्रकरणात ठाकरे गटाच्या १४ आमदारांना आणि शिंदे गटाच्या ४० आमदारांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ ये अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली असून या आमदारांनी या नोटीसला उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे पाच महिने होऊनही ही सुनावणी पूर्ण होऊ शकलेली नाही. 

दीपक भातुसे -

मुंबई : राज्यातील शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने आणि विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेली सुनावणी पाच महिन्यांपासून प्रलंबित आहे. अशा प्रकरणात सुनावणी किती कालावधीत पूर्ण करायची याचे कोणतेही बंधन विधिमंडळ नियमात आणि कायद्यात नसल्याने हे अपात्रतेचे प्रकरण बराच काळ लांबण्याची चिन्हे आहेत. 

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ जुलै २०२२ रोजी विश्वासदर्शक ठराव मांडला होता. या ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व शिवसेनाआमदारांना व्हीप बजावला होता. मात्र शिंदेबरोबर असलेले ४० आमदार सोडून उरलेल्या १५ आमदारांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले होते. या १५ आमदारांपैकी आदित्य ठाकरे सोडून उर्वरित १४ आमदारांना व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्र करण्याची नोटीस शिंदे गटाने बजावली होती. दुसरीकडे विश्वसादर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा व्हीप शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदारांसाठी काढला होता. त्यामुळे शिंदे गटातील ज्या ४० आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले त्यांना व्हीपचे उल्लंघन केले म्हणून अपात्र करण्याची नोटीस ठाकरे गटाने बजावली होती.

याप्रकरणात ठाकरे गटाच्या १४ आमदारांना आणि शिंदे गटाच्या ४० आमदारांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ ये अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली असून या आमदारांनी या नोटीसला उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे पाच महिने होऊनही ही सुनावणी पूर्ण होऊ शकलेली नाही. 

त्या १६ आमदारांच्या अपात्रतेचे काय? राज्यातील सत्तांतर नाट्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात बजावलेल्या नोटीसप्रकरणी २९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, विधिमंडळाच्या नियमानुसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विधिमंडळावर बंधनकारक नसतो. 

यासंदर्भात विधिमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरी अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्षांच्याच हातात असतो.

टॅग्स :Courtन्यायालयMLAआमदारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे