शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

"Boss Always Right! उद्धव ठाकरेंनी निर्णय का, कशासाठी घेतला याचा विचार करायचा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:19 IST

मुरलीधर जाधव यांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका असं आवाहन ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केले आहे.

कोल्हापूर - हातकंणगले मतदारसंघावरून शिवसेनाउद्धव ठाकरे गटात नाराजी उफाळून आली आहे. अलीकडेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर या भेटीवर कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी आक्षेप घेतला. शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांना उमेदवारी देऊ नका असं त्यांनी थेट म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यावर आता ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी मुरलीधर जाधवांना चुकीचा निर्णय घेऊ नका असं आवाहन केले आहे.

उपनेते संजय पवार म्हणाले की, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधवांना कमी करून नवीन २ जणांनी नियुक्ती केली आहे. जिल्हाप्रमुख पदावर नेमणूक आणि कमी करणे हा अधिकार मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आहे. १८-१९ वर्ष मुरलीधर जाधवांनी शिवसेनेत काम केले. चांगले केले हे सर्व ठीक आहे. परंतु आता अशी वेळ आहे की आपण पक्षाला काहीतरी दिले पाहिजे. मातोश्रीवर कुणी जायचे, भेटायचे हा अधिकार कुठल्याही शिवसैनिकाचा अथवा पदाधिकाऱ्याचा नसतो. तो अधिकार उद्धव ठाकरेंचा असतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुरलीधर जाधव यांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. पक्षासोबत राहा. पक्षाने आपल्याला भरपूर दिलेले आहे. भविष्यातही प्रत्येक शिवसैनिकांची कदर करणारे उद्धव ठाकरे आहेत. तुम्ही त्यांचा विचार करा. त्यांच्या पाठिशी तुम्ही ठाम राहा. हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय उद्धव ठाकरेंनी का घेतला, कशासाठी घेतला याचा विचार आपण करायचा नसतो. Boss is always right महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवसेनेच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे निर्णय घेतात आणि घेत राहतील याची मला खात्री आहे असं सांगत संजय पवार यांनी मुरलीधर जाधवांना आवाहन केले आहे.

काय म्हणाले मुरलीधर जाधव?

२०१४ ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचे डिझेल घालून निवडून आणले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि हेच शेट्टी भाजपात जाऊन बसले, असा आरोप जाधव यांनी केला होता. राजू शेट्टींनी ठाकरेंसोबत गद्दारी केली होती असं जाधव यांनी म्हटलं. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टींना उमेदवारी देऊ नका, माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की मी तिथे लढले पाहिजे. पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, १९ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. २००५ मध्ये पक्ष फुटला तेव्हा तुमच्यासोबत राहिलो. आताही तुमच्यासोबत राहिलो. अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारखा कुणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्की विचार करेल असा इशारा जाधव यांनी दिला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना