शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या पुनर्वसनात उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 05:05 IST

१,०५३ प्रकरणांचा तपास प्रलंबित : पात्र ठरूनही १,४११ जणांना आर्थिक मदत नाही

जमीर काझी मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख वाढत असताना त्यांच्या वारसांना अर्थसाहाय्य व कुटुंबांच्या पुनर्वसनामध्ये शासकीय उदासीनता असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. शेतकरी आत्महत्यांची राज्यभरात तब्बल १,०५३ प्रकरणे चौकशीविना प्रलंबित आहेत. तर निकषात पात्र ठरूनही १,४११ जणांना आर्थिक साहाय्य मिळालेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने केवळ आश्वासन व घोषणांऐवजी ठोस कृतिशील कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.

आत्महत्याग्रस्तांच्या वारसांना दिली जाणारी मदत तुटपुंजी असूनही त्यासाठीचे निकष मात्र कठोर आहेत. तसेच अशिक्षित व गरजूंना बॅँकांकडून शेती किंवा इतर कामांसाठी कर्ज मिळण्यास फेºया घालाव्या लागत असल्याने बहुतांश जण खासगी सावकाराकडून कर्ज घेतात. त्यामुळे परवाना नसलेल्या सावकारांचे कर्ज अवैध ठरवून आत्महत्यांचे प्रकरण निकालात काढले जाते. अशा पद्धतीने गेल्या १८ वर्षांत तब्बल १४,०२६ शेतकऱ्यांचा आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरल्या आहेत. आत्महत्या झाल्यानंतर आठ दिवसांत त्याबाबतचा प्राथमिक अहवाल व त्यानंतर १५ दिवसांमध्ये समितीने पात्रता सिद्ध करावयाची असताना प्रत्यक्षात मात्र अनेक प्रकरणे सहा महिने, वर्षभर प्रलंबित आहेत.

तेरा वर्षांपासून निधीवाढ नाहीआत्महत्याग्रस्तांच्या वारसांना एक लाख रुपये मदत देण्याचा निर्णय २३ जानेवारी २००६ रोजी तत्कालीन आघाडी सरकारने घेतला. तेव्हापासून आतापर्यंत त्यामध्ये बदल केलेला नाही. १३ वर्षांत पीक बियाणे, कृषी अवजाराच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे.

वास्तविक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद पहिल्यांदा पोलीस दप्तरी होत असते. मात्र पोलीस मुख्यालयात अद्ययावत माहिती उपलब्ध नाही. मुख्यालयात आकडेवारीची मागणी केली असता २०१६ पर्यंतची माहिती उपलब्ध आहे. त्यानंतरची माहिती नसल्याचे ‘डेस्क २४’चे जनमाहिती अधिकारी व वरिष्ठ कार्यासन अधिकारी महेंद्र पडणेकर यांनी सांगितले.

पंचवार्षिक कर्जपुरवठा करण्याची गरजशेतकऱ्यांचे मूळ प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत त्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होणार नाही. त्यासाठी किमान ५ वर्षे कर्जपुरवठा करून त्यांच्या जमिनीच्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यानंतरही आवशकतेनुसार मुदतवाढ द्यावी. - किशोर तिवारी, अध्यक्ष, विदर्भ जन आंदोलन समिती

प्रत्यक्षात सरसकट कर्जमाफी हवीकर्जमाफी फसवी असल्याचे आत्महत्यांच्या वाढत्या प्रकारातून स्पष्ट होते. प्रत्यक्ष कोणतीही मदत न पोहोचविता केवळ आश्वासने व घोषणांचा भडिमार केला जात आहे. खरोखरच कर्जाच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना मुक्त करायचे असेल तर सरसकट कर्जमाफी करून त्यांना पुन्हा लागवडीसाठी आवश्यक मदत केली पाहिजे. - अनिल पवार, प्रदेश प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

आत्महत्याग्रस्तांच्या मदतीसाठीचे निकषपडीक जमीन, बॅँकेचे किंवा मान्यताप्राप्त सावकारांकडून घेतलेले कर्ज आणि त्याच्या परतफेडीसाठी होणारा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्या वारसाला एक लाखाची मदत टप्प्याटप्प्याने दिली जाते. त्यासाठी तहसीलदार, पोलीस अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन आठ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा लागतो. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मदत करण्याबाबतचा निर्णय १५ दिवसांत घेणे अपेक्षित आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारfarmer suicideशेतकरी आत्महत्या