शहरं
Join us  
Trending Stories
1
राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप
2
“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका
3
पाकिस्तानी सैन्याचा चीनसोबत डबल गेम; भडकलेल्या जिनपिंगनी दौराच रद्द केला
4
ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बने चीनमध्ये खळबळ, समुद्रातच माल सोडून पळून जातायत ड्रॅगनचे एक्सपोर्टर्स!
5
Mahaveer Jayanti 2025: एक अट्टल गुन्हेगार भगवान महावीरांच्या प्रेरणेने सन्मार्गी लागला, त्याची गोष्ट!
6
'पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या', खरगेंनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्यांना खडसावले
7
संजय बांगरचा मुलगा लंडनमध्ये झाली मुलगी 'अनया'! मुलगा असताना असं होतं क्रिकेटचं रेकॉर्ड
8
चैत्र गुरु प्रदोष: शिव होतील प्रसन्न, गुरुचे मिळेल पाठबळ; कसे करावे व्रत? पाहा, सोपी पद्धत
9
झेप्टोवरून हापुस आंबे मागविले, अन् खेळ झाला! कंपनीने केला की डिलिव्हरी बॉयने? तुम्हीच सांगा...
10
महाराष्ट्राला पाच वर्षांत मिळाले नाही एकही नवीन केंद्रीय विद्यालय, अनेक राज्यांत ६० विद्यालये झाली सुरू
11
नौदलालाही राफेलची ताकद मिळणार! ६४००० कोटींच्या डीलला मंजुरी, किती विमाने अन् कधीपर्यंत येणार...
12
षष्ठग्रही ६ राजयोगात गुरुवारी प्रदोष: ६ राशींवर धनलक्ष्मी कृपा, सर्वोत्तम काळ; शुभ-लाभ!
13
मोठी बातमी! मस्साजोगमधील आवादा कंपनीला सुरक्षा व्यवस्था तैनात; १२ लाखांची झाली होती चोरी
14
VIDEO: "गाल एकदम लाल-लाल झालेत..."; यशस्वी जैस्वाल-शुबमन गिलचा मजेशीर संवाद
15
डोनाल्ड ट्रम्प यांना 'रेसिप्रोकल टॅरिफ'चा निर्णय मागे घेणं भाग पडेल; रमेश दमानींनी सांगितली कारणे
16
आता अमेरिकेच्या निशाण्यावर फार्मा सेक्टर, मोठा बॉम्ब टाकण्याच्या तयारीत ट्रम्प; भारताचं टेन्शन वाढणार!
17
स्वस्त होतंय असं म्हणताच सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, खदेरीपूर्वी पाहा Gold-Silver चे लेटेस्ट रेट
18
पत्नी करतेय छळ तर तुम्हीही करू शकता तक्रार; कायद्याने पतीला काय दिलेत अधिकार?
19
'भारत एकमेव देश, जो अमेरिकेसोबत...' डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर जयशंकर स्पष्टच बोलले
20
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची चकमक, तीन दहशतवाद्यांना घेरले; गोळीबार सुरूच

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना थोडीतरी लाज, शरम असती तर...; रामदास कदमांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:52 IST

कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं.

मुंबई - दिशा सालियान हिच्या मृत्यूनंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. नारायण राणे यांनी जाहीरपणे आदित्य ठाकरेंचा या घटनेशी संबंध असून माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत असं सांगितले होते. दुर्दैवाने आतापर्यंत ते कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत. मात्र दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव घेत त्याच्यासोबत तिघांनी मिळून माझ्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला अशी याचिका दाखल केली आहे. ही बाब इतकी गंभीर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आदित्य ठाकरे याच्यावर बलात्काराचा आरोप होतोय, ही चांगली बाब नाही असं सांगत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

रामदास कदम म्हणाले की, ज्या बाळासाहेबांनी मराठी मुलींची इज्जत, अब्रू वाचवली. त्यासाठी भगवा झेंडा खांद्यावर घेत पक्ष काढला. त्या बाळासाहेबांच्या नातवावर बलात्काराचे आरोप होतायेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीतरी इज्जत, लाज, शरम असती तर तोंडाला काळे फासून देश सोडून गेले असते. अनेक गोष्टी अशा होतात पण त्याचे पुरावे मिळत नाही. उद्धव ठाकरे ज्यावेळी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांशी हाताशी धरून पुरावे नष्ट केलेत का याची माहिती घेणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना फोन केला, तुमची मुले आहेत तसा माझा मुलगा आहे अशी चर्चा मी ऐकली. सत्यता किती नारायण राणे सांगतील. मात्र ही बाब महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. आदित्य ठाकरे रात्री ११ वाजता बाहेर पडतो, पहाटे ५ वाजता घरी येतो. हा रात्रभर नेमका कुठे असतो. कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं.

दरम्यान,  या महाराष्ट्रात मुलींची अब्रू सुरक्षित नसेल, त्यांचे खून होत असतील आणि ठाकरे कुटुंबावर आरोप होत असेल तर उद्धव ठाकरे देशाच्या पंतप्रधानांवर बोलतात, अमित शाहांवर बोलतात. एकनाथ शिंदेंवर बोलतात. वारेमाप देवेंद्र फडणवीसांवर बोलतो त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का? मातोश्री बाहेर पडण्याचाही नैतिक अधिकार नाही. दिशा सालियनचे वडील कोर्टात गेलेत, कोर्ट काय आदेश देते ते पाहू. कोर्टाने चौकशीचे आदेश दिले तर सखोल चौकशी झाली पाहिजे. जे काही खरे आहे ते बाहेर आणले पाहिजे. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे धंदे काय सुरू आहेत हे महाराष्ट्रालाही कळले पाहिजे असंही रामदास कदम म्हणाले. 

टॅग्स :Disha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदम