शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना थोडीतरी लाज, शरम असती तर...; रामदास कदमांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:52 IST

कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं.

मुंबई - दिशा सालियान हिच्या मृत्यूनंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. नारायण राणे यांनी जाहीरपणे आदित्य ठाकरेंचा या घटनेशी संबंध असून माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत असं सांगितले होते. दुर्दैवाने आतापर्यंत ते कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत. मात्र दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव घेत त्याच्यासोबत तिघांनी मिळून माझ्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला अशी याचिका दाखल केली आहे. ही बाब इतकी गंभीर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आदित्य ठाकरे याच्यावर बलात्काराचा आरोप होतोय, ही चांगली बाब नाही असं सांगत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

रामदास कदम म्हणाले की, ज्या बाळासाहेबांनी मराठी मुलींची इज्जत, अब्रू वाचवली. त्यासाठी भगवा झेंडा खांद्यावर घेत पक्ष काढला. त्या बाळासाहेबांच्या नातवावर बलात्काराचे आरोप होतायेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीतरी इज्जत, लाज, शरम असती तर तोंडाला काळे फासून देश सोडून गेले असते. अनेक गोष्टी अशा होतात पण त्याचे पुरावे मिळत नाही. उद्धव ठाकरे ज्यावेळी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांशी हाताशी धरून पुरावे नष्ट केलेत का याची माहिती घेणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना फोन केला, तुमची मुले आहेत तसा माझा मुलगा आहे अशी चर्चा मी ऐकली. सत्यता किती नारायण राणे सांगतील. मात्र ही बाब महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. आदित्य ठाकरे रात्री ११ वाजता बाहेर पडतो, पहाटे ५ वाजता घरी येतो. हा रात्रभर नेमका कुठे असतो. कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं.

दरम्यान,  या महाराष्ट्रात मुलींची अब्रू सुरक्षित नसेल, त्यांचे खून होत असतील आणि ठाकरे कुटुंबावर आरोप होत असेल तर उद्धव ठाकरे देशाच्या पंतप्रधानांवर बोलतात, अमित शाहांवर बोलतात. एकनाथ शिंदेंवर बोलतात. वारेमाप देवेंद्र फडणवीसांवर बोलतो त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का? मातोश्री बाहेर पडण्याचाही नैतिक अधिकार नाही. दिशा सालियनचे वडील कोर्टात गेलेत, कोर्ट काय आदेश देते ते पाहू. कोर्टाने चौकशीचे आदेश दिले तर सखोल चौकशी झाली पाहिजे. जे काही खरे आहे ते बाहेर आणले पाहिजे. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे धंदे काय सुरू आहेत हे महाराष्ट्रालाही कळले पाहिजे असंही रामदास कदम म्हणाले. 

टॅग्स :Disha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदम