शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

युती-आघाडीकडून घटकपक्ष दुर्लक्षीत; सत्तास्थापनेत प्रमुख पक्षांमध्येच चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:36 IST

आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही.  

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. तर प्रमुख राजकीय पक्षांच ठरत नसल्याने सर्वांच घटकांची कोंडी होत आहे. या गोंधळात युती आणि आघाडीसोबत असलेले मित्रपक्ष चांगलेच हैराण झाले आहेत. 

शिवसेना समसमान वाटपासाठी आग्रही असल्यामुळे युतीत खिंडार पडले आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर भाजपने आपण सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांना पुढे काय असा प्रश्न पडला आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडी करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात शरद पवार आणि सोनिया गांधी करतील ती पूर्व दिशा आहे. परंतु, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेकाप हे कुठेही दिसत नाहीत. अर्थात आघाडीच्या चर्चेपासून ते दूर आहेत.  

दुसरीकडे युतीसोबत असलेले विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष , महादेव जाणकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती पक्ष अजुनही भाजपची सत्ता येईल याच आशेवर आहे. या तिन्ही मित्रपक्षांच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांना भाजपच्याच भूमिकेवर लक्ष ठेवून राहावे लागत आहे. 

एकूणच आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही.