शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

युती-आघाडीकडून घटकपक्ष दुर्लक्षीत; सत्तास्थापनेत प्रमुख पक्षांमध्येच चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:36 IST

आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही.  

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. तर प्रमुख राजकीय पक्षांच ठरत नसल्याने सर्वांच घटकांची कोंडी होत आहे. या गोंधळात युती आणि आघाडीसोबत असलेले मित्रपक्ष चांगलेच हैराण झाले आहेत. 

शिवसेना समसमान वाटपासाठी आग्रही असल्यामुळे युतीत खिंडार पडले आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर भाजपने आपण सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांना पुढे काय असा प्रश्न पडला आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडी करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात शरद पवार आणि सोनिया गांधी करतील ती पूर्व दिशा आहे. परंतु, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेकाप हे कुठेही दिसत नाहीत. अर्थात आघाडीच्या चर्चेपासून ते दूर आहेत.  

दुसरीकडे युतीसोबत असलेले विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष , महादेव जाणकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती पक्ष अजुनही भाजपची सत्ता येईल याच आशेवर आहे. या तिन्ही मित्रपक्षांच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांना भाजपच्याच भूमिकेवर लक्ष ठेवून राहावे लागत आहे. 

एकूणच आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही.