शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ, बोनसचे दिवस, किती व कधी मिळणार याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 6:52 AM

केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात महागाई भत्त्यामध्ये एक टक्क्याने वाढ केल्यानंतर राज्य सरकारने आपल्या सरकारी इतर पात्र कर्मचा-यांंचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात महागाई भत्त्यामध्ये एक टक्क्याने वाढ केल्यानंतर राज्य सरकारने आपल्या सरकारी इतर पात्र कर्मचा-यांंचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढीव भत्त्याची रक्कम १ आॅगस्ट २०१७ पासून रोखीने देण्याचा आदेश आज वित्त विभागाने काढला आहे.१ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढले जातील, असे सांगण्यात आले आहे. ही रक्कम रोखीने कधी दिली जाणार, हे निश्चित नसले तरी ती दिवाळीपूर्वी कर्मचाºयांना मिळण्याची शक्यता आहे.महागाई भत्त्याची रक्कम देण्यासाठी विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे तशीच यापुढेही चालू राहील. तसेच हे आदेश सुधारित वेतनश्रेणीमध्ये व अशा वेतनास लागू असलेल्या संस्थांमधील कर्मचा-यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.याखेरीज सरकारी कर्मचा-यांना दिवाळीच्या काळात त्याआधी फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स दिला जातो. ती रक्कम ठरावीक कर्मचा-यांनाच मिळते आणि नंतर १२ महिन्यांमध्ये ती कापून घेण्यात येते. यंदा ती रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम एकत्र मिळावी, अशी कर्मचा-यांची इच्छा आहे.>सर्वत्र चर्चा बोनसचीदसरा जवळ येताना वा तो होऊ न गेल्यानंतर लगेचच खासगी उद्योग व कार्यालयांतील कर्मचा-यांच्या बोनसची तयारी सुरू होते. नवरात्र सुरू झाल्यामुळे कर्मचाºयांमध्ये यंदा बोनस कधी व किती मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या मंदी असल्याने यंदा बोनस मिळणार का, ही शंकाही अनेक जण व्यक्त करीत आहेत. बोनसची घोषणा खासगी कंपन्यांनी आतापर्यंत केलेली नाही. ती कधी होणार, याची कर्मचारी वाट पाहत आहेत.