शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ईव्हीएमच्या गैरवापराने जिंकले तर असंतोष पसरेल, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:39 IST

जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकले तर मोठा असंतोष पसरेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबई : जनतेत असंतोष आहे. ईव्हीएमने हे जिंकू शकतात आणि  हे जिंकत आहेतच. मात्र, आता हे जिंकणार नाहीत, असा गैरसमज पसरवत आहेत. जनता हा लोकशाहीतला सर्वांत मोठा घटक आहे. जनतेच्या मनाविरुद्ध तोडाफोडीचे राजकारण भाजप करत आहे. जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकले तर मोठा असंतोष पसरेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत भाजपच्या लोकसभेच्या पहिल्या यादीवरून टीका केली. ते म्हणाले, उद्योगपती, शेतकरी, कामगार यांच्यात असंतोष आहे. आपण जनतेसोबत आहोत. क्रांती ही नेते करत नसून क्रांती जनता करते. जनतेच्या मनाविरुद्ध झाले तर जनता क्रांती करणारच, भाजपने चंदीगडमध्येही अशा प्रकारे जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्यसभा निवडणुकीनंतर असाच प्रयत्न केला. मात्र, आता तोडा, फोडा, तुरुंगात टाका आणि राज्य करा हे जास्त काळ टिकणार नाही.  राज्यातल्या तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत फक्त घोषणा पोहोचतात, प्रत्यक्षात काहीच नाही. दहा वर्षांत अनेक जुन्या योजनांची नावे बदलली आहेत, तसेच आता जुमलाचे नाव गॅरंटी झाले आहे, अशीही टीका त्यांनी केली.

भाजपने गडकरींसारख्या निष्ठावंताला डावललेभाजपने १९५ जणांची यादी जाहीर केली. मात्र, नितीन गडकरींचे नाव पहिल्या यादीत नाही, तर बेहिशेबी मालमत्ता जमवणाऱ्या कृपाशंकर सिंह यांचे नाव पहिल्या यादीत आहे. ही आजची भाजप आहे, असे ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक