शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ठाकरे सरकारच्या कॅबिनेट निर्णयाविरोधात काँग्रेसमध्ये मतभेद?; फेरविचार करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 18:07 IST

आम्ही काँग्रेस म्हणून मत मांडलं आहे. जो काही निर्णय घ्यायचाय तो सरकारला घ्यायचा आहे. सरकारने विचार करावा असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देसरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही लोकांची मते मांडली आहेत.जनतेचे प्रश्न आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही भूमिका मांडणे काँग्रेसचं काम आहे. मंत्रिमंडळात सर्वांचे मत घेऊन निर्णय घेतला. प्रभाग रचना ही दोन सदस्यीय व्हावी हीच काँग्रेस मागणी आहे

मुंबई – आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारच्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. तीन सदस्यीय प्रभाग रचनेला ठाकरे मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. याबाबत लवकरच अध्यादेश काढून राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. परंतु सरकारच्या या निर्णयाविरोधात सत्ताधारी पक्षातील काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचं मत डावललं जातंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress Nana Patole) म्हणाले की, सरकार आणि संघटना या दोन बाजू आहेत. संघटना वेगळी आहे आणि सरकार वेगळं आहे. सरकारसमोर आम्ही आमचं मत मांडलं आहे. आता सरकारने विचार करावा. त्रिसदस्यीय प्रभागऐवजी दोन सदस्यीय प्रभाग करावेत ही काँग्रेसची मागणी आहे. आम्ही काँग्रेस म्हणून मत मांडलं आहे. जो काही निर्णय घ्यायचाय तो सरकारला घ्यायचा आहे. सरकारने विचार करावा. द्विसदस्यीय प्रभाग रचनेत योग्यरित्या निवडणुकीचा प्रचार केला जाऊ शकतो. स्थानिकांना त्यात न्याय देता येईल. सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही लोकांची मते मांडली आहेत. त्यामुळे सरकारने आता निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितले आहे.

तर जनतेचे प्रश्न आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही भूमिका मांडणे काँग्रेसचं काम आहे. अनेक लोकांनी मागणी आहे द्विसदस्यीय प्रभाग व्हावेत. परंतु कॅबिनेटमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळात सर्वांचे मत घेऊन निर्णय घेतला. प्रभाग रचना ही दोन सदस्यीय व्हावी हीच काँग्रेस मागणी आहे असं नाना पटोले म्हणाले परंतु नागरिकांच्या विकासासाठी सर्व एकमताने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यामुळे या निर्णयावरुन काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचं उघड होत आहे.

प्रभाग रचनेतील बदलांवरुन राज ठाकरेंचा संताप

आपल्याला हव्या त्या पद्धतीने प्रभाग रचना करायची आणि पैसा ओतून निवडणुका जिंकायची. या पद्धतीचा त्रास लोकांना का, लोकांनी एकाऐवजी 3-3 उमेदवारांना का मतदान करायचं? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) उपस्थित केला आहे. जनतेला गृहीत धरुन हवे ते करायचं, हे योग्य व कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे, असेही राज यांनी म्हटले आहे.

3 सदस्यीय प्रभागरचनेला मंजुरी

महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य, परंतु, दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ४ सदस्यीय प्रभागाचा प्रस्ताव होता परंतु अनेकांनी ३ सदस्यीय प्रभाग योग्य ठरेल असं म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ३ सदस्यीय प्रभाग रचनेला मंजुरी दिली. महाविकास आघाडीने एकमताने हा निर्णय घेतल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसState Governmentराज्य सरकार