शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:59 IST

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले.

ठळक मुद्देविद्यापीठाच्या परीक्षा मंडळ संचालक पदाचा दिला राजीनामा नवीन परीक्षा मंडळ संचालकांचा शोध घ्यावा लागणार ऑनलाईन पध्दतीने पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात झाला होता गोंधळ

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्यापरीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अशोक चव्हाण यांनी परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक पदाचा राजीमाना दिला असून येत्या दोन आठवड्यात त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला पुन्हा एकदा नवीन परीक्षा मंडळाच्या संचालकांचा शोध घ्यावा लागणार आहे.विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले. त्यामुळेच माजी परीक्षा नियंत्रक डॉ.संपदा जोशी यांनी आपला कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर माजी उपकुलसचिव बाळासाहेब नाईक तसेच तत्कालीन बीसीयुडी डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी काही काळ परीक्षा नियंत्रक पदाची सूत्रे स्वीकारली. मात्र, माजी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांच्या कार्यकालात डॉ.अशोक चव्हाण यांची परीक्षा नियंत्रक पदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली. नवीन कायद्यात परीक्षा नियंत्रक पदाचे नाव परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक असे करण्यात आले. सुमारे साडेचार वर्षे अशोक चव्हाण यांनी या पदावर काम केले. मात्र, आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे विद्यापीठाला नवीन परीक्षा मंडळ संचालकांचा शोध घ्यावा लागणार आहे.तसेच पुढील काही दिवस या पदाचा कार्यभार दुस-या सक्षम व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना परीक्षा मंडळाकडून ऑनलाईन पध्दतीने पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात गोंधळ झाला होता. त्यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली होती.त्यावर विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.या समितीने आपला अहवाल कुलगुरू कार्यालयाकडे सूपूर्द केला असून याविषयावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही चर्चा झाली.त्यात परीक्षा विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले.आता चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.परंतु,वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगितले जात आहे.गेल्या काही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक पदाचा कार्यकाल एकाही व्यक्तीने पूर्ण केला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून या पदाचा कार्यभार दुस-या सक्षम व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना परीक्षा मंडळाकडून ऑ नलाईन पध्दतीने पाठविल्या जाणा-या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात गोंधळ झाला होता. त्यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली होती.त्यावर विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.या समितीने आपला अहवाल कुलगुरू कार्यालयाकडे सूपूर्द केला असून याविषयावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही चर्चा झाली.त्यात परीक्षा विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले.आता चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वतुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.परंतु,वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगितले जात आहे.गेल्या काही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक पदाचा कार्यकाल एकाही व्यक्तीने पूर्ण केला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून या पदावर काम करणा-या व्यक्तीला सहकार्य दिले जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.तसेच चव्हाण यांनी जानेवारी २०२० मध्ये आपला कार्यकाल संपत असताना त्यापूर्वीच का राजीनामा दिला? याचा ही विचार विद्यापीठाने करणे गरजेचे आहे,असेही बोलले जात आहे.दरम्यान चव्हाण यांनी दिलेला राजीमाना विद्यापीठाकडून स्वीकारण्यात आला असून त्यांना येत्या २२ जुलै रोजी कार्यमुक्त केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...........गेल्या साडेचार वर्षात परीक्षा विभागात सर्व सहका-यांना बरोबर घेऊन चांगले काम करता आले.मात्र,घरगुती कारणामुळे मी राजीनामा दिला आहे.परीक्षा मंडळ संचालक पदावरून कार्यमुक्त झाल्यावर पुन्हा औरंगाबाद विद्यापीठात बॅटनी विभागात प्राध्यापक पदावर रुजू होण्यासाठी जाणार आहे.डॉ.अशोक चव्हाण,संचालक,परीक्षा व मुल्यमापन मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठexamपरीक्षाnitin karmalkarनितीन करमळकर