शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:59 IST

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले.

ठळक मुद्देविद्यापीठाच्या परीक्षा मंडळ संचालक पदाचा दिला राजीनामा नवीन परीक्षा मंडळ संचालकांचा शोध घ्यावा लागणार ऑनलाईन पध्दतीने पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात झाला होता गोंधळ

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्यापरीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अशोक चव्हाण यांनी परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक पदाचा राजीमाना दिला असून येत्या दोन आठवड्यात त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला पुन्हा एकदा नवीन परीक्षा मंडळाच्या संचालकांचा शोध घ्यावा लागणार आहे.विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले. त्यामुळेच माजी परीक्षा नियंत्रक डॉ.संपदा जोशी यांनी आपला कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर माजी उपकुलसचिव बाळासाहेब नाईक तसेच तत्कालीन बीसीयुडी डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी काही काळ परीक्षा नियंत्रक पदाची सूत्रे स्वीकारली. मात्र, माजी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांच्या कार्यकालात डॉ.अशोक चव्हाण यांची परीक्षा नियंत्रक पदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली. नवीन कायद्यात परीक्षा नियंत्रक पदाचे नाव परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक असे करण्यात आले. सुमारे साडेचार वर्षे अशोक चव्हाण यांनी या पदावर काम केले. मात्र, आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे विद्यापीठाला नवीन परीक्षा मंडळ संचालकांचा शोध घ्यावा लागणार आहे.तसेच पुढील काही दिवस या पदाचा कार्यभार दुस-या सक्षम व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना परीक्षा मंडळाकडून ऑनलाईन पध्दतीने पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात गोंधळ झाला होता. त्यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली होती.त्यावर विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.या समितीने आपला अहवाल कुलगुरू कार्यालयाकडे सूपूर्द केला असून याविषयावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही चर्चा झाली.त्यात परीक्षा विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले.आता चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.परंतु,वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगितले जात आहे.गेल्या काही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक पदाचा कार्यकाल एकाही व्यक्तीने पूर्ण केला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून या पदाचा कार्यभार दुस-या सक्षम व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना परीक्षा मंडळाकडून ऑ नलाईन पध्दतीने पाठविल्या जाणा-या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात गोंधळ झाला होता. त्यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली होती.त्यावर विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.या समितीने आपला अहवाल कुलगुरू कार्यालयाकडे सूपूर्द केला असून याविषयावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही चर्चा झाली.त्यात परीक्षा विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले.आता चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वतुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.परंतु,वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगितले जात आहे.गेल्या काही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक पदाचा कार्यकाल एकाही व्यक्तीने पूर्ण केला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून या पदावर काम करणा-या व्यक्तीला सहकार्य दिले जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.तसेच चव्हाण यांनी जानेवारी २०२० मध्ये आपला कार्यकाल संपत असताना त्यापूर्वीच का राजीनामा दिला? याचा ही विचार विद्यापीठाने करणे गरजेचे आहे,असेही बोलले जात आहे.दरम्यान चव्हाण यांनी दिलेला राजीमाना विद्यापीठाकडून स्वीकारण्यात आला असून त्यांना येत्या २२ जुलै रोजी कार्यमुक्त केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...........गेल्या साडेचार वर्षात परीक्षा विभागात सर्व सहका-यांना बरोबर घेऊन चांगले काम करता आले.मात्र,घरगुती कारणामुळे मी राजीनामा दिला आहे.परीक्षा मंडळ संचालक पदावरून कार्यमुक्त झाल्यावर पुन्हा औरंगाबाद विद्यापीठात बॅटनी विभागात प्राध्यापक पदावर रुजू होण्यासाठी जाणार आहे.डॉ.अशोक चव्हाण,संचालक,परीक्षा व मुल्यमापन मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठexamपरीक्षाnitin karmalkarनितीन करमळकर