शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:59 IST

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले.

ठळक मुद्देविद्यापीठाच्या परीक्षा मंडळ संचालक पदाचा दिला राजीनामा नवीन परीक्षा मंडळ संचालकांचा शोध घ्यावा लागणार ऑनलाईन पध्दतीने पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात झाला होता गोंधळ

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्यापरीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अशोक चव्हाण यांनी परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक पदाचा राजीमाना दिला असून येत्या दोन आठवड्यात त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला पुन्हा एकदा नवीन परीक्षा मंडळाच्या संचालकांचा शोध घ्यावा लागणार आहे.विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले. त्यामुळेच माजी परीक्षा नियंत्रक डॉ.संपदा जोशी यांनी आपला कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर माजी उपकुलसचिव बाळासाहेब नाईक तसेच तत्कालीन बीसीयुडी डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी काही काळ परीक्षा नियंत्रक पदाची सूत्रे स्वीकारली. मात्र, माजी कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांच्या कार्यकालात डॉ.अशोक चव्हाण यांची परीक्षा नियंत्रक पदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली. नवीन कायद्यात परीक्षा नियंत्रक पदाचे नाव परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक असे करण्यात आले. सुमारे साडेचार वर्षे अशोक चव्हाण यांनी या पदावर काम केले. मात्र, आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे विद्यापीठाला नवीन परीक्षा मंडळ संचालकांचा शोध घ्यावा लागणार आहे.तसेच पुढील काही दिवस या पदाचा कार्यभार दुस-या सक्षम व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना परीक्षा मंडळाकडून ऑनलाईन पध्दतीने पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात गोंधळ झाला होता. त्यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली होती.त्यावर विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.या समितीने आपला अहवाल कुलगुरू कार्यालयाकडे सूपूर्द केला असून याविषयावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही चर्चा झाली.त्यात परीक्षा विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले.आता चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.परंतु,वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगितले जात आहे.गेल्या काही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक पदाचा कार्यकाल एकाही व्यक्तीने पूर्ण केला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून या पदाचा कार्यभार दुस-या सक्षम व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना परीक्षा मंडळाकडून ऑ नलाईन पध्दतीने पाठविल्या जाणा-या प्रश्नपत्रिकेच्या कामकाजात गोंधळ झाला होता. त्यामुळे विद्यापीठाची चांगलीच नाचक्की झाली होती.त्यावर विद्यापीठाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली.या समितीने आपला अहवाल कुलगुरू कार्यालयाकडे सूपूर्द केला असून याविषयावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतही चर्चा झाली.त्यात परीक्षा विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले.आता चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वतुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.परंतु,वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगितले जात आहे.गेल्या काही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक पदाचा कार्यकाल एकाही व्यक्तीने पूर्ण केला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून या पदावर काम करणा-या व्यक्तीला सहकार्य दिले जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.तसेच चव्हाण यांनी जानेवारी २०२० मध्ये आपला कार्यकाल संपत असताना त्यापूर्वीच का राजीनामा दिला? याचा ही विचार विद्यापीठाने करणे गरजेचे आहे,असेही बोलले जात आहे.दरम्यान चव्हाण यांनी दिलेला राजीमाना विद्यापीठाकडून स्वीकारण्यात आला असून त्यांना येत्या २२ जुलै रोजी कार्यमुक्त केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...........गेल्या साडेचार वर्षात परीक्षा विभागात सर्व सहका-यांना बरोबर घेऊन चांगले काम करता आले.मात्र,घरगुती कारणामुळे मी राजीनामा दिला आहे.परीक्षा मंडळ संचालक पदावरून कार्यमुक्त झाल्यावर पुन्हा औरंगाबाद विद्यापीठात बॅटनी विभागात प्राध्यापक पदावर रुजू होण्यासाठी जाणार आहे.डॉ.अशोक चव्हाण,संचालक,परीक्षा व मुल्यमापन मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठexamपरीक्षाnitin karmalkarनितीन करमळकर