शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालक आता थेट ऑनलाईन भेटणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 06:00 IST

राज्य पोलीस मुख्यालयातील कामात गती व पारदर्शकता आणण्यात अप्पर महासंचालक राजेंद्रसिंह, संजीवकुमार सिंघल, संजयकुमार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

-  डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्याच्या पोलीस महासंचालकांना भेटण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केल्यामुळे दररोज अनेक अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन  अडचणींचे निराकरण करून घेत आहेत. आता तर संजय पांडे व सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस शिपायांनासुद्धा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.

राज्य पोलीस मुख्यालयातील कामात गती व पारदर्शकता आणण्यात अप्पर महासंचालक राजेंद्रसिंह, संजीवकुमार सिंघल, संजयकुमार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. कधीकाळी राज्याच्या पोलीस मुख्यालयात कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवेश करणे व आपल्या नोकरी विषयक अडचणीसाठी वरिष्ठांची भेट होणे, भेट झालीच तर अडचणींचे निराकरण होणे हे दुरापास्तच होते. या अडचणी, अडचणींचे ‘अर्थ ‘व दगडात बांधकाम असलेली इमारत या पार्श्वभूमीवर अनेकजण याचा उल्लेख दगडीचाळ असा करीत. सध्या मात्र सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य पोलीस मुख्यालयाची दारे सताड उघडी आहेत. इतकेच नव्हे तर सर्व प्रकरणांची माहिती मुक्तपणे देण्यात येत आहे.पूर्वीची पद्धतn    महासंचालक कार्यालयात जाण्यापूर्वी परवानगीसाठी अर्ज व मुख्यालयातून दिलेल्या वेळेतच भेट.n    आठवड्यात फक्त १ दिवस मर्यादित लोकांच्या मुलाखती.n    अनेकवेळा अर्ज महासंचालक कार्यालयात पोहोचत नसे किंवा पोहोचला तर वेळ दिली जात नसे.n    मुलाखत झाली तरी निराकरणाचा  कालबद्ध कार्यकाल नसे.

अर्जाची पद्धतn    परवानगीची आवश्यकता नाही. n    मुलाखतीसाठी येणाऱ्यांसाठी विश्रागृहात थांबण्याची सोय.n    कामकाजाच्या दिवशी दररोज मुलाखत.n    सकाळच्या सत्रात नाव नोंदणी करून आपला अर्ज द्यावा लागतो.n    दररोज पावणे तीन वाजता सभागृहात अर्जाच्या सर्व माहिती व संचिकेसह संबंधित अधिकारी हजर.n    बदली, पदोन्नतीच्या यादीत नाव आहे काय, किती क्रमांकावर आहे, कोणत्या ठिकाणचा प्रस्ताव आहे या माहितीचे मुक्तपणे वितरण.n    ३ वाजता महासंचालक व इतर वरिष्ठ सभागृहात.n    प्रत्येकाचे गाऱ्हाणे ऐकून संचिकेतील माहिती घेऊन कालबद्ध निराकरण दिलेल्या कालावधीत काम झाले नाही तर पुन्हा भेटण्याची तारीख निश्चित.n    अर्जावरच निर्णयाची नोंद . यामुळे पुन्हा संचिकेत टीपणी लिहून अनेक टेबलवर फिरण्याची आवश्यकता नाही.n    एखाद्याने एकट्याने भेटण्याची विनंती केली तर यासाठी वेळ देण्यात येतो.

राज्य पोलीस मुख्यालयात दररोज ३०० ते ४०० तक्रारी प्राप्त होतात. यात पोलीस व नागरिकांचा दोघांचाही समावेश असतो. प्रत्येक महिन्याकाठी सुमारे ६ हजार अशा अर्जांचे पारदर्शकपणे निराकरण करण्यात येते. एकाच कार्यालयात होणाऱ्या तक्रारींच्या निराकरणाची संख्या ही राज्यात सर्वाधिक असावी.- राजेंद्र सिंह, अप्पर पोलीस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था)

टॅग्स :Policeपोलिस