शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पोलीस कर्मचाऱ्यांना महासंचालक आता थेट ऑनलाईन भेटणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 06:00 IST

राज्य पोलीस मुख्यालयातील कामात गती व पारदर्शकता आणण्यात अप्पर महासंचालक राजेंद्रसिंह, संजीवकुमार सिंघल, संजयकुमार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

-  डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्याच्या पोलीस महासंचालकांना भेटण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केल्यामुळे दररोज अनेक अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन  अडचणींचे निराकरण करून घेत आहेत. आता तर संजय पांडे व सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस शिपायांनासुद्धा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.

राज्य पोलीस मुख्यालयातील कामात गती व पारदर्शकता आणण्यात अप्पर महासंचालक राजेंद्रसिंह, संजीवकुमार सिंघल, संजयकुमार यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. कधीकाळी राज्याच्या पोलीस मुख्यालयात कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवेश करणे व आपल्या नोकरी विषयक अडचणीसाठी वरिष्ठांची भेट होणे, भेट झालीच तर अडचणींचे निराकरण होणे हे दुरापास्तच होते. या अडचणी, अडचणींचे ‘अर्थ ‘व दगडात बांधकाम असलेली इमारत या पार्श्वभूमीवर अनेकजण याचा उल्लेख दगडीचाळ असा करीत. सध्या मात्र सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य पोलीस मुख्यालयाची दारे सताड उघडी आहेत. इतकेच नव्हे तर सर्व प्रकरणांची माहिती मुक्तपणे देण्यात येत आहे.पूर्वीची पद्धतn    महासंचालक कार्यालयात जाण्यापूर्वी परवानगीसाठी अर्ज व मुख्यालयातून दिलेल्या वेळेतच भेट.n    आठवड्यात फक्त १ दिवस मर्यादित लोकांच्या मुलाखती.n    अनेकवेळा अर्ज महासंचालक कार्यालयात पोहोचत नसे किंवा पोहोचला तर वेळ दिली जात नसे.n    मुलाखत झाली तरी निराकरणाचा  कालबद्ध कार्यकाल नसे.

अर्जाची पद्धतn    परवानगीची आवश्यकता नाही. n    मुलाखतीसाठी येणाऱ्यांसाठी विश्रागृहात थांबण्याची सोय.n    कामकाजाच्या दिवशी दररोज मुलाखत.n    सकाळच्या सत्रात नाव नोंदणी करून आपला अर्ज द्यावा लागतो.n    दररोज पावणे तीन वाजता सभागृहात अर्जाच्या सर्व माहिती व संचिकेसह संबंधित अधिकारी हजर.n    बदली, पदोन्नतीच्या यादीत नाव आहे काय, किती क्रमांकावर आहे, कोणत्या ठिकाणचा प्रस्ताव आहे या माहितीचे मुक्तपणे वितरण.n    ३ वाजता महासंचालक व इतर वरिष्ठ सभागृहात.n    प्रत्येकाचे गाऱ्हाणे ऐकून संचिकेतील माहिती घेऊन कालबद्ध निराकरण दिलेल्या कालावधीत काम झाले नाही तर पुन्हा भेटण्याची तारीख निश्चित.n    अर्जावरच निर्णयाची नोंद . यामुळे पुन्हा संचिकेत टीपणी लिहून अनेक टेबलवर फिरण्याची आवश्यकता नाही.n    एखाद्याने एकट्याने भेटण्याची विनंती केली तर यासाठी वेळ देण्यात येतो.

राज्य पोलीस मुख्यालयात दररोज ३०० ते ४०० तक्रारी प्राप्त होतात. यात पोलीस व नागरिकांचा दोघांचाही समावेश असतो. प्रत्येक महिन्याकाठी सुमारे ६ हजार अशा अर्जांचे पारदर्शकपणे निराकरण करण्यात येते. एकाच कार्यालयात होणाऱ्या तक्रारींच्या निराकरणाची संख्या ही राज्यात सर्वाधिक असावी.- राजेंद्र सिंह, अप्पर पोलीस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था)

टॅग्स :Policeपोलिस