शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

डिंभे धरण उजव्या कालव्याला गळती

By admin | Updated: August 25, 2016 01:40 IST

पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात जलजागृती सप्ताह आयोजित करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला

घोडेगाव : राज्यभर पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात जलजागृती सप्ताह आयोजित करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आज जलसंपदा विभागाची धरणे भरल्यानंतर त्यांच्याच धरण व कालव्यांना असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आंबेगाव तालुक्यात शिनोली गावाजवळ घोड नदीवरून गेलेल्या डिंभे धरण उजवा कालव्याला लागलेल्या गळतीमुळे आजही मोठ्या प्रमाणात पाणी गळून वाया जात आहे. सध्या धरण व कालव्यांना लागलेल्या पाणीगळतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून धरण व कालव्यांमधील गळती थांबविण्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही; त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. या गळतीमुळे धरणांना धोका निर्माण झाला आहे, तर कालवे फुटण्याची शक्यता कालव्यांजवळ राहणारे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ही गळती काढण्याचे काम तत्काळ केले गेले नाही, तर भविष्यात मोठा बिकट प्रसंग ओढवू शकतो. जलसंपदा विभागाने पाणीबचतीचा संदेश लोकांना देण्यापेक्षा स्वत: पाणीगळती थांबविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे व ही गळतीची कामे चांगली दर्जेदार केली पाहिजेत. पाणीगळती थांबली, तर पाणीटंचाईमध्ये या पाण्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. (वार्ताहर)>कुकडी प्रकल्पातील डिंभे व माणिकडोह धरणांना मोठ्या प्रमाणात गळती आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाहून जाते. तसेच, सध्या आंबेगाव तालुक्यातून गेलेल्या डिंभे धरण उजवा कालव्याला मोठी गळती सुरू आहे. शिनोली गावाजवळ घोड नदीवरून गेलेल्या कालव्यातून सध्या धबधब्यासारखे पाणी पडत आहे. हे पाणी पडताना पाहून अनेकजण भीती व्यक्त करतात. सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस आयचे तालुक्यातील नेते बी. बी. राक्षे यांनी ही गळती तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.