शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

डिंभे धरण उजव्या कालव्याला गळती

By admin | Updated: August 25, 2016 01:40 IST

पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात जलजागृती सप्ताह आयोजित करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला

घोडेगाव : राज्यभर पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात जलजागृती सप्ताह आयोजित करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आज जलसंपदा विभागाची धरणे भरल्यानंतर त्यांच्याच धरण व कालव्यांना असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आंबेगाव तालुक्यात शिनोली गावाजवळ घोड नदीवरून गेलेल्या डिंभे धरण उजवा कालव्याला लागलेल्या गळतीमुळे आजही मोठ्या प्रमाणात पाणी गळून वाया जात आहे. सध्या धरण व कालव्यांना लागलेल्या पाणीगळतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून धरण व कालव्यांमधील गळती थांबविण्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही; त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. या गळतीमुळे धरणांना धोका निर्माण झाला आहे, तर कालवे फुटण्याची शक्यता कालव्यांजवळ राहणारे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ही गळती काढण्याचे काम तत्काळ केले गेले नाही, तर भविष्यात मोठा बिकट प्रसंग ओढवू शकतो. जलसंपदा विभागाने पाणीबचतीचा संदेश लोकांना देण्यापेक्षा स्वत: पाणीगळती थांबविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे व ही गळतीची कामे चांगली दर्जेदार केली पाहिजेत. पाणीगळती थांबली, तर पाणीटंचाईमध्ये या पाण्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. (वार्ताहर)>कुकडी प्रकल्पातील डिंभे व माणिकडोह धरणांना मोठ्या प्रमाणात गळती आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाहून जाते. तसेच, सध्या आंबेगाव तालुक्यातून गेलेल्या डिंभे धरण उजवा कालव्याला मोठी गळती सुरू आहे. शिनोली गावाजवळ घोड नदीवरून गेलेल्या कालव्यातून सध्या धबधब्यासारखे पाणी पडत आहे. हे पाणी पडताना पाहून अनेकजण भीती व्यक्त करतात. सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस आयचे तालुक्यातील नेते बी. बी. राक्षे यांनी ही गळती तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.