शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महाराष्ट्रात जमीन उताऱ्यांचे डिजिटायझेशन अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 09:43 IST

प्रक्रिया गतिमान करण्याची केंद्र सरकारची राज्यांना सूचना

ठळक मुद्देप्रक्रिया गतिमान करण्याची केंद्र सरकारची राज्यांना सूचना

नवी दिल्ली : देशातील केरळ, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सात राज्यांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्व जमिनींच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन केले आहे; मात्र महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्या दिशेने जलद पावले उचलावीत अशी सूचना केंद्र सरकारने या राज्यांना केली आहे. यासंदर्भात केंद्रीय वित्त मंत्रालयाने राज्यांना पाठविलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, जमिनीच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करता येईल. जमिनीच्या कागदपत्रांच्या डिजिटायझेशन केलेल्या नोंदी बँक व वित्तीय संस्थांना ऑनलाइन उपलब्ध झाल्यास ते अधिक सोयीचे होणार आहे. बँकांकडे तारण असलेल्या किती जमिनींच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन झाले आहे याचा अहवालही केंद्र सरकारने मागविला आहे.

यासंदर्भात सरकारी सूत्रांनी सांगितले की, जमिनींच्या कागदपत्रांच्या डिजिटायझेशननंतर कर्जाचे ऑनलाइन वाटप करताना त्यावर शुल्क आकारणेही सुलभ होणार आहे. तसेच कर्जवाटपातील घोटाळ्यांचे प्रमाणही कमी होऊ शकेल. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, तेथील शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यांतील बँकांकडे जावे लागत आहे. त्यामुळे कर्ज देण्याची प्रक्रिया मंदावते. ही स्थिती सुधारण्यासाठी राज्यांनी वेगाने पावले उचलावीत असे केंद्र सरकारने जानेवारी महिन्यातील एका परिपत्रकात म्हटले आहे. 

२०२१-२२च्या केंद्रीय अर्थसंकल्पात १६.५ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. २०२०-२१ साली हे प्रमाण १५ लाख कोटी रुपये होते. २०१९-२०मध्ये हा आकडा १३.५० लाख कोटी रुपये होता. पशुसंवर्धन, दुधाचे उत्पादन, मासेमारी यासाठी या रकमेतून कर्जे देण्यावर केंद्र सरकारचा कटाक्ष होता.

अल्प मुदतीच्या कर्जांसाठी दिली सवलतकृषी क्षेत्राला पतपुरवठा वाढविण्यासाठी, केंद्र सरकारने अल्प मुदतीच्या ३ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी याआधीच व्याजदर कमी केले आहेत. कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अतिरिक्त ३ टक्के रक्कम देण्यात आली. त्यांच्या कर्जावरील व्याजाचा दर ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला. 

टॅग्स :digitalडिजिटलMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारFarmerशेतकरी