शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

दिघी बंदराचा अपुरा वापर, सामंजस्य करारामुळे आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:50 AM

देशाच्या पश्चिम किना-यावर आणि मुंबई या आर्थिक राजधानीच्या जवळ महत्त्वाचे बंदर म्हणून विकसित करण्यात आलेल्या दिघी बंदराची १८ लाख टन क्षमता वापराविना पडून आहे.

चिन्मय काळे मुंबई : देशाच्या पश्चिम किना-यावर आणि मुंबई या आर्थिक राजधानीच्या जवळ महत्त्वाचे बंदर म्हणून विकसित करण्यात आलेल्या दिघी बंदराची १८ लाख टन क्षमता वापराविना पडून आहे. हे बंदर आता केंद्राकडून संजीवनी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेशी झालेला सामंजस्य करार तंतोतंत पाळला गेल्यास, हे बंदर भविष्यात जेएनपीटीलादेखील मागे टाकेल, असा विश्वास दिघी पोर्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.राज्याच्या मेरिटाइम बोर्डाकडून २०५२ पर्यंत लीझवर असलेल्या दिघी बंदरात आयात-निर्यातीचा चेहरा बदलण्याची क्षमता आहे. लीझ करार होऊन आता १५ वर्षे लोटली, तरी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे हे बंदर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले नाही. १६०० एकरावरील या बंदरात वर्षाला २० लाख टन मालाची चढ-उतार क्षमता आहे. प्रत्यक्षात केवळ दीड ते दोन लाख टन एवढीच उलाढाल येथून सुरू आहे.‘दिघी हे गुजरात ते दक्षिण भारतापर्यंत पश्चिम किनाºयावरीले महत्त्वाचे बंदर ठरू शकते, पण बंदरापर्यंत येण्यासाठी आतापर्यंत हवा तसा महामार्गच येथे तयार होऊ शकलेला नाही. रेल्वेची कनेक्टिव्हिटीदेखील अद्याप नाही. त्यामुळे या बंदरावरून सामानाची ये-जा करण्यात अडचणी आहेत. सुदैवाने पायाभूत सुविधांची कामे आता सुरू झाली आहेत. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास, येत्या तीन वर्षांत दिघी पोर्ट पश्चिम भारतातील अति महत्त्वाचे बंदर ठरेल,’ असे मत कलंत्री यांनी व्यक्त केले.दिघी पोर्ट हे देशाच्या आर्थिक राजधानीपासून जेमतेम ८० किमीवर आहे. अलीकडेच केंद्र सरकारने दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये (डीएमआयसी) या बंदराचा समावेश केला. त्यामुळे आगरदांंडा ते माणगाव मार्गे दिघी, तसेच दिघी ते माणगाव हा मार्ग राष्टÑीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. माणगावहून हाच रस्ता पुढे पुण्यापर्यंत जाणार आहे. ७५० कोटी रुपयांची ही योजना १४ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासोबतच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अंतर्गत पनवेल-रोहा मार्ग दिघीशी जोडला जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वेमार्फत दिघी बंदर दक्षिणेकडे केरळपर्यंत, तर उत्तरेकडे दिल्लीपर्यंत जोडले जाईल. ही योजना ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याची कामे सुरू झाली असली, तरी वेग कायम असावा, अशी अपेक्षा कलंत्री यांनी व्यक्त केली.>स्वस्त जलवाहतूक दुर्लक्षितकुठल्याही प्रकारच्या माल वाहतुकीत जलवाहतूक सर्वात स्वस्त असते. रस्तेमार्गे जिथे २.५० रुपये प्रती किमी खर्च येतो, तिथे जलवाहतुकीचा खर्च हा फक्त २५ पैसे प्रती किमी आहे. अशावेळी केवळ पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने दिघी पोर्टसारख्या बंदरावरुन फक्त दोन लाख टन मालाची उलाढाल होत आहे. त्यातही ७० टक्क्याहून आयात आहे. निर्यातीचा आकडा आणखी कमी आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई