शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:11 IST

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Nitesh Rane on Uddhav Thackeray and Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झालीय. आधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतभेद विसरण्याबद्दल भाष्य केले आणि नंतर त्याला उत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या हिताचा हवाला देत किरकोळ वाद मागे ठेवण्याचे संकेत दिले. यावरुनच मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे सध्या राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत बोलत आहेत. पण हे रश्मी वहिनींना त्यांनी विचारलं आहे का असा खोचक सवाल नितेश राणे यांनी केला.

मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी उद्धव यांनी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा सल्ला घेतला होता का, असा प्रश्न नितेश राणे यांनी एबीपी हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारला आहे. गेल्या काही दिवसांत, राज आणि उद्धव यांच्या झालेल्या भेटी आणि त्यानंतर एकत्र येण्याचा प्रस्ताव यावरुन विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावरुनच नितेश राणे यांनी रश्मी ठाकरेंचा उल्लेख करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

"उद्धव ठाकरे जे बोलत आहेत ते रश्मी ठाकरे यांना मान्य आहे का? उद्धव ठाकरेंची मर्जी आहे का?  राज ठाकरेंबाबत अडचण उद्धव ठाकरेंना होती की त्यांच्या घरच्यांना होती. ३९ वर्षे माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केले आहे. राज ठाकरेंबाबत उद्धव ठाकरे यांना जास्त अडचण होती की रश्मी ठाकरे यांना हे विचारा. उद्धव ठाकरेंना कोण विचारत आहे. जर त्यांना सोबत यायचं असेल तर रश्मी ठाकरे यांना विचारलं पाहिजे की हे चालेल का. याबाबत बोलण्याआधी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरे यांना विचारलं होतं का? हेसुद्धा विचारायला हवं. ज्यांनी त्यांना जवळून पाहिलं आहे त्यांच्यामधीलच आम्ही आहोत," असे नितेश राणे म्हणाले.

"महाविकास आघाडीचं सरकार कोण चालवत होतं? ठाकरेंच्या सरकार कोण चालवत होतं? मातोश्रीपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वैभव चेंबर्सच्या चौथ्या माळ्यावर सर्व आयएएस आणि आयपीएस अधिकारी का जायचे? हे त्यांना विचारा. तिथे रश्मी ठाकरे आणि श्रीधर पाटणकर बसून सर्व गोष्टी करायचे. हे मी पहिल्यांदा बोललो नाही. हे सर्वांना माहिती आहे. आम्ही फक्त फॅक्ट सांगण्याची हिंमत ठेवतो," असंही नितेश राणे म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे