शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकर यांचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:46 IST

Prakash Ambedkar : पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेला? असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

अकोला : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.‌ धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेला? असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी अकोल्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, "धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळात देखील बाबासाहेबांचा, महात्मा फुले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असतील ते गावागावत बसवले गेलेत. त्यावेळी ते नुसते चबुतर्‍यावर बसवले गेलेत. मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही. पुतळे विद्रूप करण्याच्या, विटंबना करण्याच्या बातम्या आजवर आल्या आहेत. मात्र, पुतळा पडल्याच्या बातम्या माझ्या तरी बघण्यात अथवा ऐकण्यात नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय?" असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. 

याचबरोबर, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता ती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम तर यात केले गेले नाही ना? अशा संशयाला जागा आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी  केली आहे. तसेच, या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची माफी का मागत नाही? असाही सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाईमालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडूना आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, यादुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन व्यक्तींपैकी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी कोल्हापूरमधून चेतन पाटील याला ताब्यात घेतले आहे. तर जयदीप आपटे हा अद्याप दुर्घटना घडल्यापासून फरार आहे.    

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण