शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

रणजीत पाटलांना ‘ते’ मंत्रिपद भोवले? अतिआत्मविश्वास नडला, प्रचार निष्क्रिय

By यदू जोशी | Updated: February 4, 2023 11:50 IST

डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे हे संभाव्य मंत्रिपद कारणीभूत ठरले, अशी जोरदार चर्चा प्रदेश भाजपच्या वर्तुळात आहे. 

- यदु जोशीमुंबई : डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि भाजपच्या अमरावती विभागातील आमदारांच्या भुवया ताणल्या गेल्या. पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे हे संभाव्य मंत्रिपद कारणीभूत ठरले, अशी जोरदार चर्चा प्रदेश भाजपच्या वर्तुळात आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाटील हे गृह, सामान्य प्रशासन आणि नगरविकास अशा अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री होते. ‘फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती’ अशी त्यांची ओळख आहे. फडणवीस या निवडणुकीत अमरावतीला पाटील यांच्या प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी भाषणात पाटील यांची प्रशंसा केली. राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी खूपच कौतुक केले. इथेच पाटील यांच्याबाबत उद्या हे आमदार झाले तर पुन्हा वर बसतील, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात झाली. 

आ. रामदास आंबटकर हे भाजपचे विधान परिषद सदस्य असून पाटील यांची पक्षपातळीवर प्रचाराची धुरा त्यांच्याकडे होती. पाटील यांचे मंत्रिपद नक्की आहे असे सांगणे त्यांनी सुरू केले. पाटील यांना विजयासाठी मदत व्हावी या हेतूने केलेला हा प्रचार त्यांच्या अंगलट आल्याचे मानले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यातच पाटील विधान परिषदेवर गेले तर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, मग आपल्या आमदारांची संधी हुकेल, असा विचार भाजप आमदारांच्या समर्थकांमध्ये सुरू झाला आणि त्यातूनच उत्साह निवळू लागला असे बोलले जात आहे. 

डॉ. रणजित पाटील विरुद्ध पूर्ण भाजप असे चित्र अकोला जिल्ह्यात पहिल्यापासूनच आहे. ते कायम राहिल्याचे निकालावरून दिसते. पाटील यांची निष्क्रियता, जुन्या पेन्शन योजनेची जोरदार मागणी, मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी प्रभावीपणे राबविलेली प्रचार यंत्रणा हीदेखील पाटील यांच्या पराभवाची कारणे मानली जातात. 

जितकी मतदार नोंदणी झाल्याचे प्रदेश कार्यालयाला सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात तितकी नोंदणी खरंच झाली होती का, याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे. समांतर यंत्रणा पाटील यांनी राबविल्याने समन्वयाचा अभाव होता, असेही मानले जात आहे.

पक्षाकडून गंभीर दखलभाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची गुरुवारी रात्री बैठक झाली. या पराभवाची गंभीर दखल पक्षाकडून घेतली गेली असून लवकरच पाचही जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मतदारांना गृहित धरलेभाजपचा परंपरागत मतदार हा भाजपच्या दावणीला बांधला गेला आहे, तो जाईल कुठे हा अतिआत्मविश्वास नडला. रा. स्व. संघाची यंत्रणा, भाजपची यंत्रणा आणि पाटील यांच्यात शेवटपर्यंत योग्य ताळमेळ झाला नाही असेही म्हटले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक