शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

रणजीत पाटलांना ‘ते’ मंत्रिपद भोवले? अतिआत्मविश्वास नडला, प्रचार निष्क्रिय

By यदू जोशी | Updated: February 4, 2023 11:50 IST

डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे हे संभाव्य मंत्रिपद कारणीभूत ठरले, अशी जोरदार चर्चा प्रदेश भाजपच्या वर्तुळात आहे. 

- यदु जोशीमुंबई : डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि भाजपच्या अमरावती विभागातील आमदारांच्या भुवया ताणल्या गेल्या. पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे हे संभाव्य मंत्रिपद कारणीभूत ठरले, अशी जोरदार चर्चा प्रदेश भाजपच्या वर्तुळात आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाटील हे गृह, सामान्य प्रशासन आणि नगरविकास अशा अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री होते. ‘फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती’ अशी त्यांची ओळख आहे. फडणवीस या निवडणुकीत अमरावतीला पाटील यांच्या प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी भाषणात पाटील यांची प्रशंसा केली. राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी खूपच कौतुक केले. इथेच पाटील यांच्याबाबत उद्या हे आमदार झाले तर पुन्हा वर बसतील, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात झाली. 

आ. रामदास आंबटकर हे भाजपचे विधान परिषद सदस्य असून पाटील यांची पक्षपातळीवर प्रचाराची धुरा त्यांच्याकडे होती. पाटील यांचे मंत्रिपद नक्की आहे असे सांगणे त्यांनी सुरू केले. पाटील यांना विजयासाठी मदत व्हावी या हेतूने केलेला हा प्रचार त्यांच्या अंगलट आल्याचे मानले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यातच पाटील विधान परिषदेवर गेले तर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, मग आपल्या आमदारांची संधी हुकेल, असा विचार भाजप आमदारांच्या समर्थकांमध्ये सुरू झाला आणि त्यातूनच उत्साह निवळू लागला असे बोलले जात आहे. 

डॉ. रणजित पाटील विरुद्ध पूर्ण भाजप असे चित्र अकोला जिल्ह्यात पहिल्यापासूनच आहे. ते कायम राहिल्याचे निकालावरून दिसते. पाटील यांची निष्क्रियता, जुन्या पेन्शन योजनेची जोरदार मागणी, मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी प्रभावीपणे राबविलेली प्रचार यंत्रणा हीदेखील पाटील यांच्या पराभवाची कारणे मानली जातात. 

जितकी मतदार नोंदणी झाल्याचे प्रदेश कार्यालयाला सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात तितकी नोंदणी खरंच झाली होती का, याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे. समांतर यंत्रणा पाटील यांनी राबविल्याने समन्वयाचा अभाव होता, असेही मानले जात आहे.

पक्षाकडून गंभीर दखलभाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची गुरुवारी रात्री बैठक झाली. या पराभवाची गंभीर दखल पक्षाकडून घेतली गेली असून लवकरच पाचही जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मतदारांना गृहित धरलेभाजपचा परंपरागत मतदार हा भाजपच्या दावणीला बांधला गेला आहे, तो जाईल कुठे हा अतिआत्मविश्वास नडला. रा. स्व. संघाची यंत्रणा, भाजपची यंत्रणा आणि पाटील यांच्यात शेवटपर्यंत योग्य ताळमेळ झाला नाही असेही म्हटले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक