शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:05 IST

Nilesh Rane on Vinayak Raut: दीपक केसरकर हे सामनावीर आहेत. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला असे सांगत आमदार नितेश राणे यांनी किरण सामंतांकडून दगाफटका झाला की नाही यावर भाष्य केले आहे. 

महायुतीचे उमेदवार नारायण राणे 48 हजार मतांनी निवडून आले. 10 वर्ष निष्क्रीय असलेल्या विनायक राऊत यांना बदलण्याचा निर्णय जनतेने घेतला होता. राणे यांनी मागील 40 वर्ष केलेळ्या सेवेची पोचपावती जनतेने दिली आहे. कुडाळ मालवणच्या जनतेने 2014 चे शल्य दूर केले आहे. ही वैभव नाईक यांची हार आहे. तर दीपक केसरकर हे सामनावीर आहेत. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला असे सांगत आमदार नितेश राणे यांनी किरण सामंतांकडून दगाफटका झाला की नाही यावर भाष्य केले आहे. 

केसरकर यांनी केवळ शब्दात न ठेवता कृती करून दाखवली आहे. जस काम केसरकर यांनी केले तसे काम इतर कार्यकर्त्यांनी करावे. यापुढे महायुती ताकदीने उत्तरत असेल तर महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. उबाठा हा आपला एकमेव शत्रू पक्ष आहे. जर महायुती धर्म पाळला नाही तर पुढील निवडणुका कठीण जातील. असा इशारा देत नितेश राणे यांनी उबाठाच्या अदृश्य हातांचे आभार मानले. 

बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी राणेंना मदत केली. त्यांना उद्धव ठाकरेंची धोरणे आवडली नव्हती. विनायक राऊतांनी शिवसेना संपविण्याचे काम केले.  उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा झाली त्यात आम्हाला शिव्या शाप दिले. लोकांनी त्याचा वचपा काढला, असे राणे म्हणाले. 

उबाठावाले आणि महाविकास आघाडीवाले दिवाळी का साजरी करत आहेत? देशात महायुतीच्या जास्त जागा आहेत. मोदींचा राजीनामा मागण्या पूर्वी वरळीचा राजीनामा द्या, तुझ्या मालकाच्या मुलाच्या मतदार संघात काय झाले ते बघावे, अशी टीका राणे यांनी संजय राऊतांवर केली.   

काँग्रेस नसती तर उबाठाची भावपूर्ण श्रद्धांजली झाली असती. राणे संपले असे म्हणणारे आता बिळात लपून बसले आहेत.  यापुढे आमच्या मतदार संघात रोजगार देणारे प्रकल्प येणार आहेत. किरण सामंतांमुळे आम्हाला कुठलाही फटका बसला नाही. किरण सामंत यांनी आपल्या परीने चांगले काम केले. ग्रीन रिफायनरी राजापूर मध्येच उभारण्यासाठी लोकांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४