शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

कोरेगाव भीमा हिंसाचाराला सरकारचे पाठबळ होते का? मुंडेंचा सवाल, विरोधकांचा गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 04:14 IST

मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही.

मुंबई : मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही. त्यांच्यापुढे सरकार हतबल झाले असून कोरेगाव-भीमाच्या घटनेला सरकारचे पाठबळ होते का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला.कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली होती. याप्रकरणी सभागृहात नियम २८९ अन्वये चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. दोषींना अटक करावी या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज सुरुवातीला वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.१ जानेवारीपूर्वीच काही संघटनांनी कोरेगाव भीमा परिसरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. याची कल्पना असूनही पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. या घटनेला दोन महिने उलटूनही हल्लेखोर आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक झाली नसल्याचे गायकवाड म्हणाले. यावेळी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप , जोगेंद्र कवाडे यांनीही हिंसाचारामागील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.त्यामुळे यावर आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेली स्थगन प्रस्तावाची सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावली. याशिवाय विरोधकांच्या अन्य तीन स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनातच नाकारल्याची घोषणा सभापतींनी केली. मात्र, स्थगन प्रस्तावावर बोलू देण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने सभापतींनी दिवसरभराचेच कामकाज तहकूब केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBhima-koregaonभीमा-कोरेगाव