शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

कोरेगाव भीमा हिंसाचाराला सरकारचे पाठबळ होते का? मुंडेंचा सवाल, विरोधकांचा गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 04:14 IST

मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही.

मुंबई : मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही. त्यांच्यापुढे सरकार हतबल झाले असून कोरेगाव-भीमाच्या घटनेला सरकारचे पाठबळ होते का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला.कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली होती. याप्रकरणी सभागृहात नियम २८९ अन्वये चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. दोषींना अटक करावी या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज सुरुवातीला वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.१ जानेवारीपूर्वीच काही संघटनांनी कोरेगाव भीमा परिसरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. याची कल्पना असूनही पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. या घटनेला दोन महिने उलटूनही हल्लेखोर आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक झाली नसल्याचे गायकवाड म्हणाले. यावेळी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप , जोगेंद्र कवाडे यांनीही हिंसाचारामागील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.त्यामुळे यावर आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेली स्थगन प्रस्तावाची सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावली. याशिवाय विरोधकांच्या अन्य तीन स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनातच नाकारल्याची घोषणा सभापतींनी केली. मात्र, स्थगन प्रस्तावावर बोलू देण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने सभापतींनी दिवसरभराचेच कामकाज तहकूब केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBhima-koregaonभीमा-कोरेगाव