शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा हिंसाचाराला सरकारचे पाठबळ होते का? मुंडेंचा सवाल, विरोधकांचा गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 04:14 IST

मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही.

मुंबई : मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यामुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झालेला असताना राज्य सरकार त्यांना अटक करू शकले नाही. त्यांच्यापुढे सरकार हतबल झाले असून कोरेगाव-भीमाच्या घटनेला सरकारचे पाठबळ होते का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला.कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली होती. याप्रकरणी सभागृहात नियम २८९ अन्वये चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. दोषींना अटक करावी या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज सुरुवातीला वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.१ जानेवारीपूर्वीच काही संघटनांनी कोरेगाव भीमा परिसरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. याची कल्पना असूनही पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. या घटनेला दोन महिने उलटूनही हल्लेखोर आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक झाली नसल्याचे गायकवाड म्हणाले. यावेळी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, भाई जगताप , जोगेंद्र कवाडे यांनीही हिंसाचारामागील गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.त्यामुळे यावर आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेली स्थगन प्रस्तावाची सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावली. याशिवाय विरोधकांच्या अन्य तीन स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनातच नाकारल्याची घोषणा सभापतींनी केली. मात्र, स्थगन प्रस्तावावर बोलू देण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याने सभापतींनी दिवसरभराचेच कामकाज तहकूब केले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBhima-koregaonभीमा-कोरेगाव