शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कुजबुज! भाजपा आमदार मराठी विसरले का?; महापालिकेला इंग्रजीतून पाठवले पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 06:34 IST

या इंग्रजी पत्रव्यवहाराला उद्धवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला.

ठाणेकरांना ‘दिल्ली’ने वगळले?

दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे ठाण्यातील ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांना निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे दिल्लीने ठाणेकर साहित्यिकांना वगळल्याची चर्चा सुरू आहे. आधी झालेल्या साहित्य संमेलनाचे बागवे यांना निमंत्रण होते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वशिलेबाजी आवडते. त्यांची जे स्तुती करतात त्यांना व्यासपीठ देतात. मस्का मारून नमस्कार करण्याऱ्यांमधील मी नाही, असे बागवे म्हणाले. मला न बोलवून त्यांचे नुकसान होत आहे. माझे नाही, असेही बागवे म्हणाले.

आयलानी मराठी विसरले काय ?

शासकीय व निमशासकीय कार्यालयांना मराठीतून पत्रव्यवहार करण्याचे निर्देश दिले आहेत. उल्हासनगरातील आ. कुमार आयलानी यांनी महापालिका आयुक्तांना इंग्रजीत पत्र पाठवून अभय योजना लागू करण्याची मागणी केली. इंग्रजी म्हणजे या इंग्रजी पत्रव्यवहाराला उद्धवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. आयलानी आमदार झाले तेव्हा, त्यांनी आमदार पदाची मराठीतून शपथ घेतली होती. मराठी शिकत असल्याचे सांगितले होते. गेल्या १५ वर्षांत आयलानी यांना मराठी येऊ लागले की नाही, अशी कुजबुज सुरू आहे. 

ठाणेकरांचे पहिले प्रेम मराठीवर...

ठाण्यातील ‘आनंदोत्सव संगीत समारंभ २०२५’च्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची मुलाखत आयोजित केली होती. मुलाखत रंगात आली असतानाच त्यांनी स्टेजसमोर येऊन उभे राहत ‘दम मारो दम’ या गाण्याच्या ओळी सादर केल्या.  त्यावेळी आशाताईंनी प्रश्न केला की, हिंदी गाण्याचा प्रभाव जास्त आहे ना? त्यावर उपस्थित ठाणेकर म्हणाले की, आम्ही ठाणेकर आहोत. आमचे पहिले प्रेम हे मराठी गाण्यांवर आहे. ठाणेकरांच्या या प्रतिक्रियेनंतर आशाताईंनी ‘दम मारो दम’ आवरते घेतले आणि पुन्हा मुलाखत सुरू झाली. त्यानंतर त्यांनी काही मराठी गीते सादर करून ठाणेकर कानसेनांची इच्छा पूर्ण केली.

... आणि घरापर्यंत पोहोचले ‘राजे’ !

लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘छावा’ चित्रपटाच्या रूपात धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र सर्वदूर पोहोचवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. चित्रपट सुरू केल्यानंतर हळूहळू विकीच्या अंगात ‘राजे’ असे काही भिनले की, ते थेट त्याच्या घरापर्यंत पोहोचले. बोलण्यापासून चालण्यापर्यंत सर्वच बाबतीत विकीने स्वत:ला ‘राजे’ बनवले. त्याचे चालणे बदलले आणि तो शांत राहू लागला. ही गोष्ट पत्नी कतरीनाच्याही लक्षात आली. आपले चालणे बघून ‘यह बहुत सही लग रहा है’, असे कतरीना म्हणाल्याचे विकीने सांगितले. ही सर्व लक्षणे विकीच्या अंगात ‘राजे’ भिनल्याची असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :BJPभाजपा