शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शासन आपल्या दारीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडाच नाही; शिंदेंनी अजित पवारांना 'राज'कारण सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 17:54 IST

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून मोठ्या आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याला आता जवळपास आठवडा होऊन गेला आहे. मात्र, तरीही पवारांसह मंत्र्यांना खातेवाट झालेले नाहीय.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून मोठ्या आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याला आता जवळपास आठवडा होऊन गेला आहे. मात्र, तरीही पवारांसह मंत्र्यांना खातेवाट झालेले नाहीय. असे असताना आजच्या धुळ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात राष्ट्रवादीचा झेंडा नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत कारण सांगितले आहे. 

हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आज मी आणि देवेंद्र यांनी शिवसेना भाजपा युतीचे सरकार स्थापन केले. या वर्षात एवढे निर्णय घेतले. अजित पवार इथे आहेत. त्यांनी सांगितले की मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास होईल. देशाचे नाव जगात अभिमानाने घेतले जातेय, ते मोदींमुळेच. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून अजित पवार आणि त्यांचे आमदार सोबत आले. यामुळे सरकारची ताकद वाढली आहे, असे शिंदे म्हणाले. 

आमची युती २५ वर्षांची. यामुळे शिवसेना भाजपाचे झेंडे लागलेले आहेत. पण तुमचा राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला वेळ लागतो. पण पुढच्या कार्यक्रमांत तिन्ही पक्षांचे झेंडे नक्की लागतील. शेवटी आपला विकासाचा त्रिशूळ आहे. म्हणून या त्रिशुळामुळे समोरच्या विरोधी पक्षाला जी काही धडकी भरलीय, पायाखालची वाळी सरकलीय. जिकडे बघावे तिकडे आपल्या सरकराला पाठिंबा देणारी जनता पहायला मिळत आहे. यामुळे विरोधी पक्षाची ताकद संपली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. 

मोदी सरकारवर आरोप हा एक केविलवाना प्रयत्न आहे. मोदींवर इथे आणि परदेशात आरोप करणे हे दुर्दैवी आहे. बाळासाहेबांचे स्वप्न मोदी पूर्ण करत आहेत. म्हणून आम्ही ज्या लोकांसोबत निवडणुका लढविल्या त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. तुमच्यासारखे वेडेवाकडे केले नाही. घडाळ्याकडे बघून आम्ही काम करत नाही. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. राज्याला विकासाच्या रस्त्यावर नेण्याचे काम केल्याशिवाय राहणार नाही. आपले डबल इंजिनचे सरकार आहे. राज्याचा सर्वांगिन विकास करतेय, आसा दावा शिंदे यांनी केला.  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस