शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शासन आपल्या दारीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडाच नाही; शिंदेंनी अजित पवारांना 'राज'कारण सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 17:54 IST

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून मोठ्या आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याला आता जवळपास आठवडा होऊन गेला आहे. मात्र, तरीही पवारांसह मंत्र्यांना खातेवाट झालेले नाहीय.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून मोठ्या आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याला आता जवळपास आठवडा होऊन गेला आहे. मात्र, तरीही पवारांसह मंत्र्यांना खातेवाट झालेले नाहीय. असे असताना आजच्या धुळ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात राष्ट्रवादीचा झेंडा नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत कारण सांगितले आहे. 

हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आज मी आणि देवेंद्र यांनी शिवसेना भाजपा युतीचे सरकार स्थापन केले. या वर्षात एवढे निर्णय घेतले. अजित पवार इथे आहेत. त्यांनी सांगितले की मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास होईल. देशाचे नाव जगात अभिमानाने घेतले जातेय, ते मोदींमुळेच. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून अजित पवार आणि त्यांचे आमदार सोबत आले. यामुळे सरकारची ताकद वाढली आहे, असे शिंदे म्हणाले. 

आमची युती २५ वर्षांची. यामुळे शिवसेना भाजपाचे झेंडे लागलेले आहेत. पण तुमचा राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला वेळ लागतो. पण पुढच्या कार्यक्रमांत तिन्ही पक्षांचे झेंडे नक्की लागतील. शेवटी आपला विकासाचा त्रिशूळ आहे. म्हणून या त्रिशुळामुळे समोरच्या विरोधी पक्षाला जी काही धडकी भरलीय, पायाखालची वाळी सरकलीय. जिकडे बघावे तिकडे आपल्या सरकराला पाठिंबा देणारी जनता पहायला मिळत आहे. यामुळे विरोधी पक्षाची ताकद संपली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. 

मोदी सरकारवर आरोप हा एक केविलवाना प्रयत्न आहे. मोदींवर इथे आणि परदेशात आरोप करणे हे दुर्दैवी आहे. बाळासाहेबांचे स्वप्न मोदी पूर्ण करत आहेत. म्हणून आम्ही ज्या लोकांसोबत निवडणुका लढविल्या त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. तुमच्यासारखे वेडेवाकडे केले नाही. घडाळ्याकडे बघून आम्ही काम करत नाही. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. राज्याला विकासाच्या रस्त्यावर नेण्याचे काम केल्याशिवाय राहणार नाही. आपले डबल इंजिनचे सरकार आहे. राज्याचा सर्वांगिन विकास करतेय, आसा दावा शिंदे यांनी केला.  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस