शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

"मनोज जरांगेंनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये", माजी आमदाराचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 17:41 IST

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यात जी काही आंदोलने व उपोषणे सुरू आहेत, त्याकडे आम्ही अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. सरकारला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे, कायद्याला, नियमाला धरून आरक्षण द्यायचे आहे. यामुळे आंदोलकांनी देखील सरकारची भूमिका समजून घेत सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

दुसरीकडे, धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला आता एक मिनिट देखील वेळ देऊ नये, असे आवाहन अनिल गोटे यांनी केले आहे. तसेच, हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात नॉन सिरिअस सरकार असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले. सध्याच्या राज्य सरकारची अवस्था ही सकाळी ओरडणाऱ्या कोंबड्यासारखी झाली आहे. कोंबडा फक्त ओरडतो, परंतु अंडे मात्र देत नाही, असे म्हणत राज्य सरकारवर अनिल गोटे यांनी निशाणा साधला आहे.

याचबरोबर, हे सरकार फक्त आणि फक्त घोषणा करणार सरकार असल्याचे म्हणत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार अशा घोषणा वारंवार या सरकारच्या मंत्र्यांकडून केल्या जात आहेत. यापूर्वी देखील मराठ्यांना आरक्षण या सरकारमधील मंत्र्यांनी दिले होते. परंतु मग सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकले का नाही, असा प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनिल गोटे यांनी टीका केली. तसेच, सदावर्त्तेंची मराठा समाजसंदर्भातील सध्याची वक्तव्यं बघता त्यांचा बोलवता धनी हे देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते पडळकर किंवा सदावर्ते यांनाच कुठल्याही प्रकारची वक्तव्यं करायला लावतात असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAnil Goteअनिल गोटे