शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

धर्मा पाटील आत्महत्या : शिवसेना मंत्र्यांचा आक्रमक पवित्रा, मंत्रिमंडळ बैठकीतही मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 06:01 IST

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची गर्जना करणाºया शिवसेनेने सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली असून त्याचे पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले.

- विशेष प्रतिनिधीमुंबई : आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची गर्जना करणाºया शिवसेनेने सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली असून त्याचे पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि रामदास कदम या तीन ज्येष्ठ सेना मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला चांगलेच धारेवर धरले.परिवहन मंत्री रावते यांनी शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणावरून सरकारला घेरले. आधीच्या सत्ताधाºयांनी शेण खाल्ले म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यांना दोष देण्याऐवजी आपण शेतकºयांसाठी काय करतोय ते सांगा. मुख्यमंत्री परदेशात होते म्हणून मी त्यांना दोष देणार नाही; पण काल ज्या पद्धतीने पर्यटन मंत्री जयकुमार रावल बोलले ते योग्य नव्हते. पूर्वीच्या अधिकाºयांवर कारवाई करू असे ते म्हणत होते. गेल्या साडेतीन वर्षांत धर्मा पाटील यांना त्रास देणाºया अधिकाºयांवर कारवाई करा, असे रावते यांनी ठणकावल्याचे सूत्रांनी सांगितले. आमच्या भावना लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मा पाटील मृत्युप्रकरणी चौकशी करून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल सादर करण्यास मुख्य सचिवांना सांगितल्याची माहिती रावते यांनी पत्रकारांना दिली.एसईझेड रद्द, मग काय आणणार?नवी मुंबईतील एसईझेड रद्द करून त्या ठिकाणच्या १८०० हेक्टर जमिनीपैकी ८५ टक्के जमिनीवर उद्योग आणि १५ टक्के जमिनीवर घरे बांधण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळासमोर येताच ८५ टक्के जमिनीवर नेमके कोणते उद्योग येताहेत याची आपल्याला काहीही कल्पना नाही, असा हल्लाबोल उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला.पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कोकणच्या विकासाकडे काही खाती मुद्दाम दुर्लक्ष कशी करीत आहेत, याची उदाहरणे दिली आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी केली.एसईझेडमध्ये येणाºया उद्योगांचे नियंत्रण उद्योग विभागाकडे होते.आता हे क्षेत्र एसईझेड मुक्त करून त्याचे नियंत्रण नगरविकास विभागाकडे दिले जात आहे. त्यालाही आमचा विरोध नाही पण ८५ टक्के जमिनीवर कोणत्या प्रकारचे उद्योग येणार हे जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे, असे देसाई यांनी सुनावले.अनेक लहानमोठ्या कंपन्यांना मुंबईनजीक उद्योग उभारणीसाठी जागा हव्या असतात त्यासाठी त्या माझ्या खात्याकडे विचारणा करतात. अशावेळी नवी मुंबईनजीक कोणत्या प्रकारच्या उद्योगांची उभारणी सरकारला अपेक्षित आहे, हे उद्योग मंत्री म्हणून मलाच माहिती नसेल तर मी त्यांना काय सांगणार, असा सवाल त्यांनी केला आणि निर्णय राखून ठेवण्याची त्यांनी मागणी केली.सूत्रांनी सांगितले की ८५:१५ चा निर्णय आपल्याला आजच घ्यावा लागेल कारण, केंद्र सरकारने त्यासाठी दिलेली मुदतसंपत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निर्णयास मंत्रिमंडळाने मान्यता दिली पण ८५ टक्के जागेवरनेमके कुठले उद्योग येणार याची माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले....तर तुमच्याही खुर्च्या जळतील : सुधीर मुनगंटीवारशिवसेनेचे मंत्री आक्रमक झाल्यानंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर निशाणा साधला. ‘धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकतील’, असे शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटले होते.त्याचा समाचार घेताना मुनगंटीवार म्हणाले की, खुर्च्या फक्त आमच्याच (भाजपाच्या) जळतील असे नाही तर त्यांच्याही जळतील हे त्यांनी लक्षात घ्यावे. सरकारमध्ये एकत्र असताना जबाबदारीने वागले पाहिजे. सरकार चालविणे ही सामूहिक जबाबदारी असते.शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहेच. माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका, असे धर्मा पाटील यांच्या मुलाने म्हटले असताना इतर कोणी राजकारण करण्याचे कारणच काय, असा चिमटाही मुनगंटीवारयांनी काढला. 

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार