शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते पाहावे लागेल, शुद्धीत आल्यावर...; धनंजय मुंडेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:12 IST

NCP Dhananjay Munde Vs Jitendra Awhad: एखादा माणूस शुद्धीत नसल्यावर चुकीचे बोलतो, काहीही बरळतो, शुद्धीवर आल्यावर खरे कबूल करतो, तसाच हा प्रकार आहे, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला.

NCP Dhananjay Munde Vs Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबाबत केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. जोरदार टीका झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आपल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली. काही पुरावे दाखवत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले. यातच आता अजित पवार गटाचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत, खोचक शब्दांत टीका केली. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, तुम्ही देवाला मानता. देव सर्वांचा आहे. प्रभू रामचंद्रांबाबत देशवासीयांच्या मनात आगळे-वेगळे स्थान आहे. त्या प्रत्येकाच्या भावना दुखावणे, एवढेच काम असेल आणि आपल्या मतदारसंघातील ठराविक मतदारांसाठी चुकीची विधाने केली. आता त्यावेळी कोण काय खात होते, याचे ते साक्षीदार होते का? त्यांचे आजोबा काय जेवत होते, याचे तरी ते साक्षीदार आहेत का? मीही अशा घटनांचा साक्षीदार नाही. त्यामुळे कोणी काय खावे आणि काय नाही, याबाबत बोलणे योग्य नाही, या शब्दांत धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला.

जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते पाहावे लागेल, शुद्धीत आल्यावर...

जितेंद्र आव्हाड यांनी कोणत्या अवस्थेत ते वक्तव्य केले, कोणत्या अवस्थेत माघार घेतली, ते पाहावे लागेल. ज्या अवस्थेत ते आधी बोलले ती अवस्था आणि माघार घेतली तेव्हाची त्यांची अवस्था काय होती ते पाहायला हवे. एखादा माणूस शुद्ध नसल्यावर चुकीचे बोलतो, बेशुद्ध असल्यावर काहीही बरळतो, परंतु, शुद्धीवर आल्यावर खरे कबूल करतो, तसाच हा प्रकार आहे. हे सगळे गोंधळात टाकणारे आहे, असे सांगत धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त विधान केल्याने राजकीय गदारोळ झाला. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर  दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या विधानावरून विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर गुरुवारी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड