शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

खाऊसाहेब दानवेंनी नेहमी चकवाच दिला: धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:26 IST

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोमवारपासून सुरवात झाली आहे.

मुंबई - शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोमवारपासून सुरवात झाली आहे. ही यात्रा जालना जिल्ह्यात असताना भोकरदन येथे राष्ट्रवादी पक्षाची सभा झाली. यावेळी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सभेला संबोधित करताना केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. जालना जिल्ह्यातील जनतेने दानवे यांना अनेकवेळा संधी दिली. मात्र खाऊसाहेब दानवेंनी नेहमी ‘चकवाच’ दिला असा खोचक टोला मुंडे यांनी दानवेंना लगावला.

राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा सोमवारी जालना जिल्ह्यात होती. विशेष म्हणजे रावसाहेब दानवे यांचे पुत्र आणि आमदार संतोष दानवे यांचा मतदारसंघ असलेल्या भोकरदन येथे राष्ट्रवादीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला. जालना जिल्ह्यातील मतदारांनी दानवे यांना अनेकवेळा संधी दिली. त्यांच्या मुलाला आमदारकी दिली, मात्र खाऊसाहेब दानवे यांनी जालनाकरांना नेहमी ‘चकवाच’ दिला असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांप्रमाणे दबावतंत्र रावसाहेब दानवे वापरतात. त्यांच्या मतदारसंघातील विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले केले जात आहे. त्यामुळे आता दानवे यांना चकवा देण्याची वेळ आली असल्याचे सुद्धा मुंडे म्हणाले. तर भाजप ही पूर्णपणे भष्ट्राचारात बरबटलेली असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी केला.