शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

'फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून गिरीश महाजनांकडे त्याचा कारभार द्यावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 11:24 IST

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक मंत्र्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, आज ६ मंत्री यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्री यांना काढायला हवे होते, असंही मुंडे म्हणाले.

मुंबई - प्रशासकीय आणि पोलीस बळाच्या जोरावर दबाव टाकणे आणि फोडाफोडी करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. फोडा-फोडीचे नवे खाते काढुन गिरीश महाजन यांना त्याचे मंत्री करावे, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक मंत्र्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, आज ६ मंत्री यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्री यांना काढायला हवे होते, असंही मुंडे म्हणाले.

गिरीश महाजन यांची भाजपमध्ये तारणहार म्हणून ओळख आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी महाजन नेहमीच प्रयत्नशील असतात. तोच धागा पकडच धनंजय मुंडे यांनी महाजन यांना टोला लागवला. मुख्यमंत्र्यांनी फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून त्याचा कारभार महाजन यांच्याकडे द्यावा, असं मुंडे यांनी म्हटले.

यावेळी मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. सत्तेत येण्यापूर्वी फडणवीस यांनी अनेक आश्वसने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ आहे. या सरकारच्या काळात केवळ आभासी विकास झाल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी वातानुकूलीत खोलीत बसून दुष्काळाचा आढावा घेतला. तर सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना परदेश दौरा केल्यानंतर दुष्काळ आठवला. राज्यात दुष्काळ असून शेतकऱ्यांना कर्जाच्या अडचणी येत आहे. सरकारने केलेली कर्जमाफी पूर्णपणे फसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.