शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

माऊलींच्या समाधीवरील महापूजाबंदीला भाविकांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 20:13 IST

दैनंदिन अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय

ठळक मुद्देभाविक व पुजाऱ्यांचे जिल्हा न्यायाधीशांना लेखी निवेदन; देवस्थान निर्णयावर ठाम महापूजेदरम्यान भाविकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी  अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीच्या स्पर्शदर्शनासाठी गैरसोय

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या समाधीवर २७ डिसेंबर २०१९ पासून कमिटीच्या वतीने दैनंदिन होणाऱ्या पवमान अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीने घेतला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात साडेचारशेहून अधिक भाविक तसेच पुजाºयांनी लेखी आक्षेप घेतला आहे. याविरोधात त्यांनी जिल्हा न्यायाधीश व विधी व न्यायमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. त्यामुळे पुढील निर्णय काय होईल; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ज्ञानेश्वरमहाराजांची समाधी ही संजीवन असून, ती समाजाच्या चिरंतन श्रद्धेचा ठेवा असल्याने तिचे संवर्धन व जपणूक होणे हे सर्व भाविकांचे सार्वत्रिक व सामूहिक उत्तरदायित्व आहे. त्यामुळे समाधीची होणारी झीज तसेच  अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीच्या स्पर्शदर्शनासाठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले.  माऊलींची संजीवन समाधी ही चिरंतन राहणे आवश्यक असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने होणाऱ्या अभिषेकांमुळे समाधीची झीज होत आहे का, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यांचा अहवाल मागविण्यासाठी संस्थानने भारत सरकारचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊन संजीवन समाधीची पाहणी केली होती. समाधीवर होणाऱ्या अभिषेक व महापूजांमुळे समाधीची अधिक झीज होऊ शकते व त्यामुळे समाधीवरील दैनंदिन अभिषेकांची संख्या कमीतकमी राखली जावी असा अभिप्राय व निष्कर्ष तज्ज्ञांनी संस्थान कमिटीकडे सादर केला होता.  त्यानुसार माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांच्याकडे कमिटीच्या विश्वस्तांनी सर्व विषय कथन करून घेतला होता. सदर विषयाचे सर्व पैलू जाणून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संजीवन समाधीवरील महापूजा व अभिषेक नियंत्रित करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. त्यामुळे भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीने घेऊन मुक्ताबाई मंडपात पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केली आहे.   या निर्णयाला विरोध असेल, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात तक्रार व सूचना करण्यास देवस्थानने मुदत दिली होती. सद्यस्थितीत या निर्णयाविरोधात साडेचारशेहून अधिक भाविक तसेच पुजाऱ्यांनी लेखी आक्षेप घेतलेला आहे....................... माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी तसेच अभिषेक व महापूजा करण्यासाठी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यातच महापूजेदरम्यान भाविकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. यापार्श्वभूमीवर नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. या निर्णयाचे भाविक, वारकरी व स्थानिक नागरिकांनी स्वागत करून अभिप्राय नोंदवला आहे. तर अनेकांनी दूरध्वनीवर संपर्क साधून निर्णयाचे स्वागत केले आहे. ............ चलपादुकांवर महापूजा व अभिषेक सुरू केल्यापासून तुलनात्मक पाहणी केली असता सकाळी सहा ते अकरा या वेळेत सरासरी ७८०० ते ८००० भाविकांचे दर्शन होत आहे. यापूर्वी तीच संख्या ३६०० ते ३७०० एवढी होती. त्यामुळे हा निर्णय चांगला असल्याचे अनेकांनी अभिप्राय दिला आहे. याबाबतचा तपशील संस्थान कमिटीकडून माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना सादर केला आहे  - अ‍ॅड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर