शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

माऊलींच्या समाधीवरील महापूजाबंदीला भाविकांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 20:13 IST

दैनंदिन अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय

ठळक मुद्देभाविक व पुजाऱ्यांचे जिल्हा न्यायाधीशांना लेखी निवेदन; देवस्थान निर्णयावर ठाम महापूजेदरम्यान भाविकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी  अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीच्या स्पर्शदर्शनासाठी गैरसोय

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या समाधीवर २७ डिसेंबर २०१९ पासून कमिटीच्या वतीने दैनंदिन होणाऱ्या पवमान अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीने घेतला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात साडेचारशेहून अधिक भाविक तसेच पुजाºयांनी लेखी आक्षेप घेतला आहे. याविरोधात त्यांनी जिल्हा न्यायाधीश व विधी व न्यायमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. त्यामुळे पुढील निर्णय काय होईल; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ज्ञानेश्वरमहाराजांची समाधी ही संजीवन असून, ती समाजाच्या चिरंतन श्रद्धेचा ठेवा असल्याने तिचे संवर्धन व जपणूक होणे हे सर्व भाविकांचे सार्वत्रिक व सामूहिक उत्तरदायित्व आहे. त्यामुळे समाधीची होणारी झीज तसेच  अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीच्या स्पर्शदर्शनासाठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले.  माऊलींची संजीवन समाधी ही चिरंतन राहणे आवश्यक असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने होणाऱ्या अभिषेकांमुळे समाधीची झीज होत आहे का, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यांचा अहवाल मागविण्यासाठी संस्थानने भारत सरकारचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊन संजीवन समाधीची पाहणी केली होती. समाधीवर होणाऱ्या अभिषेक व महापूजांमुळे समाधीची अधिक झीज होऊ शकते व त्यामुळे समाधीवरील दैनंदिन अभिषेकांची संख्या कमीतकमी राखली जावी असा अभिप्राय व निष्कर्ष तज्ज्ञांनी संस्थान कमिटीकडे सादर केला होता.  त्यानुसार माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांच्याकडे कमिटीच्या विश्वस्तांनी सर्व विषय कथन करून घेतला होता. सदर विषयाचे सर्व पैलू जाणून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संजीवन समाधीवरील महापूजा व अभिषेक नियंत्रित करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. त्यामुळे भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीने घेऊन मुक्ताबाई मंडपात पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केली आहे.   या निर्णयाला विरोध असेल, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात तक्रार व सूचना करण्यास देवस्थानने मुदत दिली होती. सद्यस्थितीत या निर्णयाविरोधात साडेचारशेहून अधिक भाविक तसेच पुजाऱ्यांनी लेखी आक्षेप घेतलेला आहे....................... माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी तसेच अभिषेक व महापूजा करण्यासाठी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यातच महापूजेदरम्यान भाविकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. यापार्श्वभूमीवर नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. या निर्णयाचे भाविक, वारकरी व स्थानिक नागरिकांनी स्वागत करून अभिप्राय नोंदवला आहे. तर अनेकांनी दूरध्वनीवर संपर्क साधून निर्णयाचे स्वागत केले आहे. ............ चलपादुकांवर महापूजा व अभिषेक सुरू केल्यापासून तुलनात्मक पाहणी केली असता सकाळी सहा ते अकरा या वेळेत सरासरी ७८०० ते ८००० भाविकांचे दर्शन होत आहे. यापूर्वी तीच संख्या ३६०० ते ३७०० एवढी होती. त्यामुळे हा निर्णय चांगला असल्याचे अनेकांनी अभिप्राय दिला आहे. याबाबतचा तपशील संस्थान कमिटीकडून माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना सादर केला आहे  - अ‍ॅड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर