शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

'वंचित'च होईल विरोधीपक्ष, हे सांगणाऱ्या फडणवीसांवर विरोधात बसण्याची वेळ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 16:25 IST

पवारांनी एका भाषणात फिरवलेल्या हवेमुळे वंचितला खातही फोडता आलं नाही. तर भाजप 123 वरून 104 वर आला. वंचितच्या दारुण पराभवामुळे मुख्यमंत्र्यांचा वंचितविषयी केलेला दावा फोल ठरला. उलट फडणवीसांवरच विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली आहे.

मुंबई - लोकसभेप्रमाणेच राज्यातील विधानसभा निवडणूक देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार विरुद्ध भाजप अशीच लढवली गेली. राज्यातील भाजप नेत्यांनी सातत्याने शरद पवार यांना लक्ष्य केले. राष्ट्रावादीचे अनेक दिग्गज नेते फोडून पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला. परंतु, शरद पवारांनी सगळ्यांना धूर चारत, अनेकांना अडचणीत आणले. पवारांनी एक्झिट पोलसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दावे आपल्या कृतीतून परतावून लागले. उलट फडणवीसांवरच विरोधात बसण्याची वेळ आणली आहे.

समोर मल्लच नाही, लढायचं कोणाशी, पवारांच्या राजकारणाचा अस्त झालाय, ईडीची चौकशी आणि मी पुन्हा येईल असे मुद्दे घेत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक गाजून टाकली. महाजनादेश यात्रा त्यांनी अशा अविर्भावात काढली की, राज्यात केवळ भाजपच विजयी होणार. मात्र पवारांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत भाजपला सळो की पळो करून सोडले होते.

राज्यात आपल्यासमोर लढण्यासाठी विरोधकच नसून भविष्यातील विरोधीपक्ष वंचित असेल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे वंचितचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. किंबहुना वंचितने आपला मित्रपक्ष असलेल्या एमआयएमला देखील बाजुला केला. परंतु, पवारांनी एका भाषणात फिरवलेल्या हवेमुळे वंचितला खातही फोडता आलं नाही. तर भाजप 123 वरून 104 वर आला. वंचितच्या दारुण पराभवामुळे मुख्यमंत्र्यांचा वंचितविषयी केलेला दावा फोल ठरला. उलट फडणवीसांवरच विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली आहे.