शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Amruta Fadnavis : माजी गृहमंत्री, माजी मुंबई पोलीस आयुक्त यांचे कुठे हनीमून सुरु आहेत ते शोधा; अमृता फडणवीस यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 08:41 IST

Amruta Fadnavis : राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली तर त्यांचे वसूली सरकार कसे चालणार?, अमृता फडणवीसांचा शिवसेनेला टोला

ठळक मुद्देराष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली तर त्यांचे वसूली सरकार कसे चालणार?, अमृता फडणवीसांचा शिवसेनेला टोला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi Government) साधला निशाणा. "राज्याचे माजी गृहमंत्री असो किंवा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, त्यांचे कुठे हनीमून सुरू आहेत हे शोधून काढायला हवं. माध्यमांना जर ते कळलं तर तुम्ही त्याबाबात यंत्रणांना रिपोर्ट करा म्हणजे त्यांना लवकरात लवकर पकडता येईल," असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला.

देशात नुकताचं कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना निरनिराळ्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी बोलताना ड्रग्स पार्टी प्रकरणावरही भाष्य केलं. "महाराष्ट्र प्रगतीत पुढे जावं की ड्रग्स कॅपिटल बनावं हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे. ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या तरूणांना तुरुंगात टाकलं जावं हा माझा वैयक्तिक विचार नाही, परंतु  त्यांना त्यातून बाहेर काढायला नको का? त्यांच्यापर्यंत ड्रग्स येतात कुठून, त्याचं नेटवर्क याबाबत माहिती मिळाली पाहिजे. या मुलांच्या समुपदेशनाची आणि त्यांना सुधारगृहात ठेवण्याची गरज असते," असंही त्यांनी नमूद केलं.

यावेळी त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचा सवाल त्यांना करण्यात आला. "तुम्ही कामं तशी करत आहात म्हणून तुमच्यावर आरोप केले जात आहेत. तुम्ही भजन म्हणताय म्हणून तुमच्यावर आरोप केले जात नाहीत ना? जर तुम्ही जलयुक्त शिवारवर आरोप करू शकता, तर आम्ही समोर दिसतंय त्यावर आरोप करायचे नाही का?," असंही त्या म्हणाल्या. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं बोलत असून चुकीचं घडल्यास गप्प बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 

यावेळी त्यांनी शिवसेनेचं मुखरच्र सामनावरही निशाणा साधला. "ते भाजपवर टीका करणार. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली तर त्यांचे वसूली सरकार कसे चालणार?," असं म्हणत त्यांनी टोला लगावला. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्र