शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विधानसभेतून बाहेर पडल्यावर फडणवीसांनी कुठे वळवला मोर्चा?; काँग्रेसनं सांगितली 'आतली' चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 09:01 IST

विश्वासदर्शक ठरावावेळी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकून फडणवीस नेमके गेले कुठे?; काँग्रेस म्हणते...

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. विधानसभेचं अधिवेशन नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीनं बोलवण्यात आल्याचा आक्षेप फडणवीस यांनी नोंदवला. सरकारनं नव्या हंगामी अध्यक्षांची पायमल्ली केल्याचा आरोप करत संविधानाची पायमल्ली झाल्याचं फडणवीस म्हणाले. मात्र विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अनेक तांत्रिक बाबी सांगत फडणवीस यांचे आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर फडणवीस यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला.भाजपा आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन विरोधकांना लक्ष्य केलं. 'अशी एक चर्चा आहे की, भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्वागत करायला देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांना जायचे होतं. म्हणूनच भाजपनं सभागृहातून पळ काढला', असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं. काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणला जाण्यापूर्वीच भाजपा आमदार सभागृहातून बाहेर पडले.  भाजपाचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून बाहेर पडताच पत्रकारांशी संवाद साधला. सव्वा तीनच्या सुमारास त्यांनी सभागृहाच्या बाहेर पत्रकारांशी बातचीत केली. 'सरकारनं नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीनं विधानसभेचं अधिवेशन बोलावलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आणि संसदीय प्रथांची संपूर्ण पायमल्ली या सरकारनं केली. २७ नोव्हेंबर रोजी जे अधिवेशन झालं, ते ‘वंदे मातरम्‘ने सुरू झालं आणि राष्ट्रगीतानं सांगता झाली. याचा अर्थ ते अधिवेशन संस्थागित झालं होतं. नव्यानं अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांकडून समन्स असावा लागतो. मध्यरात्री १ वाजता हे कळवण्यात येतं. यामागे नेमका उद्देश काय?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर ५ वाजता फडणवीस यांनी एक ट्विट केलं. त्यात ते भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करताना दिसत आहेत. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा