शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

Devendra Fadnavis vs NCP: ...म्हणूनच भाजपाने मुख्यमंत्रिपद घेतलं नसेल; शशिकांत शिंदेंनी सांगितलं 'प्लॅनिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:02 IST

शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच येईल असाही व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis vs NCP: महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शिवसेनेची घुसमट होत असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली. शिवसेनेतील (Shiv Sena) बहुसंख्य आमदारांच्या साथीने त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. पण राज्यात ३५ दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळालेला नाही. पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. भाजपाकडे १००पेक्षा जास्त आमदार असूनही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर, शिंदे गटाला कोणती मंत्रिपदं मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. असं असताना आता, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी भाजपाकडे जास्त जागा असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री का झाले नाही, या संदर्भात एक दावा केला आहे.

"भाजपाकडून आत्ताच्या घडीला म्हणूनच मुख्यमंत्रीपद घेतलं गेलं नसेल. कारण अपात्र ठरले तर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी अपात्र ठरतील. मग परत भाजपा मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकतो, अशा प्रकारची रणनीती भाजपाची असू शकते. या सर्व गोष्टीचं प्लॅनिंग भाजपाच्या तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून चाललेलं असल्यामुळे या बाबतीत (मंत्रिमंडळ) निर्णय घेतलेला नाही. सरकार बनवलं आणि लगेच जर कोर्टाचा निर्णय विरोधात गेला तर नामुष्की होऊ शकते. त्याचा तोटा भाजपाला होऊ शकतो म्हणून ते 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत", असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. १६ आमदारांच्या अपात्रेपासून सर्वच प्रकारच्या याचिकांवर सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, फडणवीस यांच्या दिल्ली बैठकीत भाजपाची मंत्रिमंडळातील नावे अंतिम झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून अधिकची मंत्रिपदे आणि विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जात असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत नक्की कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, लांबत चाललेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील ५० आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांना संयम ठेवण्याचा सल्ला देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShashikant Shindeशशिकांत शिंदे