शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 20:57 IST

'2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं. मी परत आलोच, पण शिंदेंनादेखील घेऊन आलो आहे.'

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'देवेंद्रजी तुमची परिस्थीती खूप हालाखीची आहे, तुमचे अपमान होत आहेत. ते तुम्हाला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, कारण वरुन आदेश आहे,' असा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सहन होत नाही अन्...

देवेंद्र फडणवीस यांची आज अकोल्यात सभा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 'उद्धव ठाकरे आज काय काय बरळले, मला कधी कधी त्यांना म्हणावंसं वाटतं, कोण होतास तू, काय झालास तू. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणार, असे उध्दव ठाकरे सतत टेप वाजवित असतात. सध्या त्यांची कुठेकुठे आग होत आहे, हे त्यांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही,' अशी टीका फडणवीसांनी केली.

कोण होतास तू, काय झालास तू

ते पुढे म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंच्या पक्षातून रोज लोक जातात, त्यांना कळत नाही. खुर्चीसाठी ठाकरे काँग्रेस-एनसीपी सोबत गेले, त्यांचे दुकान आम्ही बंद केले. सध्या त्यांची अवस्था कोण होतास तू, काय झालास तू अशी झाली आहे. जे घरी बसतात त्यांना मोदी शहा काय कळणार. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं की, मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसना, मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊं. मी परत तर आलोच शिंदेजींना देखील परत घेऊन आलो आहे.'

मोदींनी 100 देशांना लस दिली

'जगातील फक्त 5 देश कोविडची लस बनवू शकले, त्यात भारताचे नाव आहे. मोदींनी लस दिल्यामुळे आज आपण जिवंत आहोत. मोदींनी 100 देशांना लस दिली. मी मॉरिशसला गेलो होतो, तिथले राष्ट्रपती म्हणाले, मोदींमुळे आमचा देश जिवंत आहे. शंभर देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती सांगतात, मोदींमुळे आमचे देश जिवंत आहेत. G-20 मध्ये मोदी जातात, तिथल्या बलाढ्य देशाचे राष्ट्रपती म्हणतात मोदींची सही मागतात. सगळ्या आखाती देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या सर्वोच्च सन्मान त्यांनी मोदींना दिला, हा खऱ्या अर्थाने भारताचा सन्मान आहे,' असंही फडणवीस म्हणाले.

वटवृक्ष हटवू शकत नाही

'देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि 'मोदी हटाओ'च्या घोषणा देणार आहेत. कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्ष हटवू शकत नाही. गेल्या वेळी 52 नेते एकत्र आले होते आता त्यात उधव ठाकरे यांची ही भर पडली आहे,' असा खोचक टोलाही फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAkolaअकोलाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी