शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 20:57 IST

'2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं. मी परत आलोच, पण शिंदेंनादेखील घेऊन आलो आहे.'

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'देवेंद्रजी तुमची परिस्थीती खूप हालाखीची आहे, तुमचे अपमान होत आहेत. ते तुम्हाला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, कारण वरुन आदेश आहे,' असा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सहन होत नाही अन्...

देवेंद्र फडणवीस यांची आज अकोल्यात सभा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 'उद्धव ठाकरे आज काय काय बरळले, मला कधी कधी त्यांना म्हणावंसं वाटतं, कोण होतास तू, काय झालास तू. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणार, असे उध्दव ठाकरे सतत टेप वाजवित असतात. सध्या त्यांची कुठेकुठे आग होत आहे, हे त्यांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही,' अशी टीका फडणवीसांनी केली.

कोण होतास तू, काय झालास तू

ते पुढे म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंच्या पक्षातून रोज लोक जातात, त्यांना कळत नाही. खुर्चीसाठी ठाकरे काँग्रेस-एनसीपी सोबत गेले, त्यांचे दुकान आम्ही बंद केले. सध्या त्यांची अवस्था कोण होतास तू, काय झालास तू अशी झाली आहे. जे घरी बसतात त्यांना मोदी शहा काय कळणार. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं की, मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसना, मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊं. मी परत तर आलोच शिंदेजींना देखील परत घेऊन आलो आहे.'

मोदींनी 100 देशांना लस दिली

'जगातील फक्त 5 देश कोविडची लस बनवू शकले, त्यात भारताचे नाव आहे. मोदींनी लस दिल्यामुळे आज आपण जिवंत आहोत. मोदींनी 100 देशांना लस दिली. मी मॉरिशसला गेलो होतो, तिथले राष्ट्रपती म्हणाले, मोदींमुळे आमचा देश जिवंत आहे. शंभर देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती सांगतात, मोदींमुळे आमचे देश जिवंत आहेत. G-20 मध्ये मोदी जातात, तिथल्या बलाढ्य देशाचे राष्ट्रपती म्हणतात मोदींची सही मागतात. सगळ्या आखाती देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या सर्वोच्च सन्मान त्यांनी मोदींना दिला, हा खऱ्या अर्थाने भारताचा सन्मान आहे,' असंही फडणवीस म्हणाले.

वटवृक्ष हटवू शकत नाही

'देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि 'मोदी हटाओ'च्या घोषणा देणार आहेत. कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्ष हटवू शकत नाही. गेल्या वेळी 52 नेते एकत्र आले होते आता त्यात उधव ठाकरे यांची ही भर पडली आहे,' असा खोचक टोलाही फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAkolaअकोलाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी