शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे कोणासोबतही बसायला तयार', ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 18:52 IST

आज अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीवरुन उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले. 'मला अतिशय आनंद होतोय. केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांना एकमेकांची गरज लागतेय. म्हणजेच, भाजपला पराभूत करण्याकरिता केजरीवाल कोणाशी ही हात मिळवणी करण्यासाठी तयार आहेत आणि उद्धव ठाकरे कोणासोबत देखील बसायला तयार आहेत. यातूनच भारतीय जनता पक्षाची ताकत दिसते,' अशी टीका फडणवीसांनी केली. 

यावेळी फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर बोलतांना फडणवीसांनी थेट बँकवाल्यांना तंबी दिली. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे. शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देणार असून हे आता खपवून घेतले जाणार नाही, असं ते म्हणाले. याशिवाय, शेतकऱ्यांना शिवसेना-भाजपचे सरकार हे सगळ्या प्रकारची मदत करण्यास तत्पर आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये, असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी जलयुक्त शिवारवर बोलताना फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला. जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली यावी हे, ध्येय आहे. आज झालेल्या बैठकीत प्रत्येत जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला देखील गती देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मान