शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे कोणासोबतही बसायला तयार', ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 18:52 IST

आज अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Devendra Fadnavis: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीवरुन उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले. 'मला अतिशय आनंद होतोय. केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांना एकमेकांची गरज लागतेय. म्हणजेच, भाजपला पराभूत करण्याकरिता केजरीवाल कोणाशी ही हात मिळवणी करण्यासाठी तयार आहेत आणि उद्धव ठाकरे कोणासोबत देखील बसायला तयार आहेत. यातूनच भारतीय जनता पक्षाची ताकत दिसते,' अशी टीका फडणवीसांनी केली. 

यावेळी फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर बोलतांना फडणवीसांनी थेट बँकवाल्यांना तंबी दिली. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे. शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देणार असून हे आता खपवून घेतले जाणार नाही, असं ते म्हणाले. याशिवाय, शेतकऱ्यांना शिवसेना-भाजपचे सरकार हे सगळ्या प्रकारची मदत करण्यास तत्पर आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये, असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी जलयुक्त शिवारवर बोलताना फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला. जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली यावी हे, ध्येय आहे. आज झालेल्या बैठकीत प्रत्येत जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला देखील गती देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मान