शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

हात झटकण्यात सत्ताधारी तरबेज, पवारांकडे ‘डिफेन्स’ची जबाबदारी; देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 06:54 IST

नुकसान पाहणी दौºयावर आलेल्या फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी उस्मानाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अतिवृष्टीने पिके तर गेलीच, शेतीही खरवडून गेली आहे.

उस्मानाबाद/लातूर : सत्ताधाऱ्यांत प्रचंड मतभेद आहेत. मात्र, हात झटकण्याच्या बाबतीत ते एकसुरी आहेत़ काही झाले तरी केंद्राने करावे, हा त्यांचा सूर, मदत जाहीर करायचे सोडून जीएसटी परताव्यावरुन कांगावा करीत सुटलेत. तर शरद पवार सध्या त्यांच्या ‘डिफेन्स’ची जबाबदारी सांभाळत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नुकसान पाहणी दौºयावर आलेल्या फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी उस्मानाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अतिवृष्टीने पिके तर गेलीच, शेतीही खरवडून गेली आहे. दीर्घकालीन नुकसानीच्या भरपाईसाठी विशेष योजना जाहीर केली पाहिजे़ ही वेळ राजकारणाची नाही, संवेदनशीलता दाखविण्याची आहे.केंद्र सरकार निश्चितच चांगली मदत करेल, पण राज्य सरकारनेही मदत तातडीने जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही फडणवीस म्हणाले. जलयुक्तची चौकशी लावून आमचे तोंड सरकार दाबू शकत नाही.

६ लाख कामे झाली़ त्यात केवळ ७०० तक्रारी आल्या. हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यांनी जरुर चौकशी करावी, असेही फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

करुन दाखवण्याची मुख्यमंत्र्यांना संधी...मागच्या पुराच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी २५ हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही अशीच मागणी होती. ते नेमके काय बोलले होते, याचे व्हिडीओच दाखवत फडणवीस यांनी आता आपण सत्तेत आहात, त्यामुळे बोललेले करुन दाखविण्याची संधी आहे. ती दवडू नका, अशी कोपरखळी मारली.

कर्ज काढण्यात गैर काय?शरद पवारांच्या इतका जाणकार माणूस राज्यात नाही़ त्यांना सर्व नियम, कायदे चांगले ठाऊक आहेत़ तरीही ते मदतीसाठीची प्रक्रिया सांगत आहेत. कर्ज काढावे लागेल, असे म्हणताहेत. मग अशा संकटकाळात कर्ज काढण्यात गैर काय? राज्याची पत १ लाख २० हजार कोटी कर्ज घेण्याची आहे़ त्यामुळे जरुर कर्ज काढावे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र