शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Devendra Fadnavis slams MVA: "तेव्हाच ठरवलं होतं 'मविआ'च्या लोकांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही"; देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 17:37 IST

फडणवीसांनी महाविकास आघाडी वर सडकून टीका केली

Devendra Fadnavis slams MVA: भाजपाची पनवेलमध्ये सुरू असलेली कार्यकारिणीची बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजवली. त्यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी राज्यातील मावळत्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. "मविआ सरकारच्या लोकांनी सगळे प्रकल्प बंद पाडले. महाराष्ट्राची जी अवस्था होती त्यासाठी प्रश्न पडला की सरकार कशासाठी... मग पहिल्याच दिवशी मनात गाठ बांधली की सरकार केवळ बदला घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी सत्तेत असेल, तर तेव्हाच ठरवलं होतं की या महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही", अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

" महाविकास आघाडीच्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांवर केसेस केल्या. पण कोणी घाबरलं नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्ष फक्त सूड उगवण्याचे काम केले. आमच्या विरोधात बोललात तर घर तोडू, खूप ठिकाणी पोलिस स्थानकात फिरवू, असा त्यांचा कार्यक्रम होता. अन्याय, अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली. पण आपण सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे अखेर आता खुला श्वास घेत बैठक होतेय आणि महाराष्ट्राची जनता खुला श्वास घेतेय", असेही फडणवीसांनी स्पष्ट केला.

"मविआ सरकार नेमकं कोण चालवतंय... भगवानभरोसे हे सरकार सुरू होतं. त्यामुळे महाराष्ट्राची अधोगती झाली. आपण हे सत्तेकरिता परिवर्तन केलेलं नाही. महाविकास आघाडी आल्यावर गती कमी झाली नाही तर नुसत्या स्थगिती देण्यात आल्या. आम्ही खूर्चीचा कधी विचार केला नाही, परिवर्तन व्हावं हेच महत्त्वाचं होतं. महाराष्ट्रात आश्चर्य घडलं. सत्तेत ताकद असते. ते चुंबक आहे. पण राज्यात ५० आमदारांनी सरकार सोडून विरोधी पक्षात येण्याचा निर्णय घेतला ही मोठी गोष्ट आहे", असेही त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे