शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवाद्यांचा सहभाग; देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच सादर केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:33 IST

Devendra Fadnavis : 'भारत जोडोमध्ये 180 संघटना, त्यातील 40 संघटना अर्बन नक्षलवादाशी संबंधित आहेत. आरआर पाटलांच्या काळात या संघटनांना अर्बन नक्सल म्हणून घोषित करण्यात आले.'

Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच भाषण केलं. त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी फडणवीसांनी शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. तसेच, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटनांचा सहभाग होता, त्यांनी काँग्रेससाठी देशभरात कार्यक्रम घेतले होते, असेही फडणवीसांनी सांगितले. 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, 'निवडणूक जिंकण्यासाठी काय काय केलं...पहिल्यांदाच महाराष्ट्रात बहितलं, कुणीतरी येतो आणि व्होट जिहादचा नारा देतो. 17-17 मागण्या तुम्हाला देतात आणि तुम्ही चकार शब्द काढत नाही. खरं षडयंत्र सांगतो, मालेगावमध्ये 2024 मध्ये काही युवकांनी पोलिसांत तक्रार केली की, 114 कोटी रुपयांची निनावी रोख रक्कम बँक खात्यांमध्ये आली आहे. आरोपी सिराज मोहम्मदने 14 लोकांची पॅन आणि आधार कार्ड वापरुन मालेगाव मर्चंट बँकेत खोटी खाती उघडली आणि रक्कम त्या खात्यात टाकली. पोलीस, ईडी, आयकर विभागाने चौकशी केल्यावर समजले की, देशभरात हजारो कोटींचा व्यवहार झालाय. त्यातील 600 कोटी दुबईला गेले, तर 100 कोटी निवडणुकीच्या काळात वापरले गेले.' 

'निवडणुका जिंकण्यासाठी कुठल्या स्थराला जात आहोत. देशाच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेप सुरू झालाय, त्याचेही पुरावे संसदेत मांडले गेलेत. मी 'भारत जोडो' अभियानावर बोललो होतो, तर माझ्यावर टीका केली. मी आज पुराव्यासह सांगतो. हे अभियान राहुल गांधींनी सुरू केलं होतं. त्या अभियानात कोण आहे, जरा बघा. देशात आपण नक्षलवादाविरोधात लढाई पुकारतो. नक्षलवादी काय करतात? भारताच्या संविधनावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कोणत्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे पॅरलल राज्य तयार करायचे आहे, असा नक्षलवाद्यांचा मानस आहे.' 

40 नक्षलवादी संघटनांचा भारत जोडो यात्रेत सहभाग

फडणवीस पुढे म्हणतात, 'ज्यावेळी देशात नक्षलवादाविरोधात मोठी लढाई सुरू झाली, मोठ्या प्रमाणात नक्षलवादी संपायला लागले, त्यावेळी हा नक्षलवाद शहरांमध्ये सूरू झाला. तेच अराजकतेचे विचार आपच्या मुलांमध्ये रोवले जात आहेत. 16-28 वयापर्यंत प्रत्येकाच्या मनात क्रांतीची भावना असते. या वर्गाला पकडून, यांच्यात अराजकतेचे रोपण करायचे, यासाठी फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार करण्याचे काम नक्षलवाद्यांनी केले. याचे पॉप्युलर नाव अर्बन नक्सल, असे आहे. संविधानाचे नाव घ्यायचे, पण संविधानाने तयार केलेल्या सर्व शासकीय संस्थेबद्दल लोकांमध्ये संशय तयार करायचा आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे, असे काम करायचे.'

'असे झाल्यावर काय होईल, तर लोक बंड करतील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य आणतील. हाच तर त्यांचा प्रयत्न आहे. 15 नोव्हेंबर 2024 काठमांडूला बैठक झाली, यात भारत जोडोची काही लोकं गेली होती. त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे. त्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये अराजकता पसरवण्याची योजना आखली हगेली. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या भारत जोडोमध्ये 180 संघटना आहेत, त्यांनी निवडणुकीच्या काळात देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले. त्यात 40 संघटना अशा आहेत, ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून नेम केलेलं आहे. मी नाही केलं, तर 2012 साली गिरीष बापट यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी आरआर पाटील राज्याचे गृहमंत्री होते. हा प्रश्न पुणे जिल्ह्यातील नक्षलवादी कार्यक्रमाबाबत होता.'

तुमचा खांदा अशा संघटनांना देऊ नका

'त्या प्रश्नाला उत्तर देताना आरआर पाटील म्हणाले होते की, या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख अर्बन नक्सल म्हणून केलेला आहे. आता याच संघटनांनी लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांसाठी कार्यक्रम घेतले. आरआर पाटील यांच्या काळात 48 संघटनांना अर्बन नक्सल म्हणून नेम केलेलं आहे. 18 फेब्रुवारी 2014 साली मनमोहन सिंग यांचे सरकार होते, तेव्हा 72 फ्रंटल संघटनांचे नावे समोर आली होती, त्यातील 7 महाराष्ट्रातील आहेत. याच सात संघटनांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसची कामे केली. विरोधकांच्या देशभक्तीवर आमचा अविश्वास नाही, पण निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणीची मदत घेत आहोत, हे पाहिले पाहिजे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे...तुमचा खांदा अशा संघटनांना देऊ नका, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राnaxaliteनक्षलवादी