शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

Devendra Fadnavis: 'आज लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 14:47 IST

'आजच्या निकालाने महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरले आहे.'

मुंबई- आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे तुर्तास शिंदे-फडणवीस सरकारला कुठलाही धोका नाही. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुयंक्त पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. 

यावेळी फडणवीस म्हणाले की, आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल आम्ही समाधानी आहोत. आज लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपणे विजय झाला आहे. मला या निकालाच्या काही मुद्द्यांकडे लक्ष वेधायचे आहे. सर्वात आधी, या निकालाने महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरले आहे. न्यायलयाने सांगितले की, उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

दुसरा मुद्दा म्हणजे, सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा संपूर्ण अधिकार अध्यक्षांचा असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष यावर सुनावणी घेतील. तिसरा मुद्दा म्हणजे, ज्या आमदारांविरोधात अपात्रतेची याकिका आहेत, त्यांना त्यांचे अधिकार असल्याचे कोर्टाने म्हटले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. 

ते पुढे म्हणतात, अजून एक महत्वाची बाब म्हणजे, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पूर्णपणे अधिकार असल्याचे सांगितले आहे. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो. आयोगाने घेतलेल्या निर्णयांवर उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केलेले प्रश्न पूर्णपणे चुकीचे आहेत. याशिवाय, राजकीय पक्ष कुठला, हे ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांकडे आहेत. त्यामुळे आता हे सरकार पूर्णपणे कायदेशीर, संवैधानिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय