शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पक्षाचा ‘तो’ निर्णय योग्य होता....; उपमुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस मनमोकळे बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:55 IST

मविआ सरकार जनतेने निवडून दिले नव्हते. सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते असं फडणवीस म्हणाले.

मुंबई - आमच्या सरकारला १ वर्ष होत असताना आज मागे वळून पाहिले तर तेव्हा मला उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली तेव्हा मनात खटकलं होतं. लोक काय म्हणतील, जो मुख्यमंत्री राहिला आहे तो उपमुख्यमंत्री बनतोय. सत्तेसाठी किती लालसा असेल. परंतु १ वर्षांनी माझ्या पक्षाने घेतलेला निर्णय योग्य होता असं वाटते. कारण जे काम तुम्ही सरकारमध्ये राहून करता ते सरकारबाहेर राहून करता येत नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही गेल्या १ वर्षात अनेक परिवर्तनवादी निर्णय घेतले. अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी एकही प्रकल्प राबवला नाही जो त्यांनी केला आहे असं म्हणता येईल. आमचे सरकार आल्यानंतर सर्व विकासकामांना गती मिळाली. कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर रोड या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. मुंबईचं नवीन एअरपोर्ट पुढील वर्ष सुरू होईल. आम्ही १ वर्षात १० मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू केले. केवळ १ वर्षात २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. मविआ सरकारने जे निर्णय अडवले होते ते निर्णय आम्ही घेतले. हे वर्ष निर्णयांचे होते असं त्यांनी सांगितले. ANI च्या मुलाखतीत ते बोलत होते.

तसेच मविआ सरकार जनतेने निवडून दिले नव्हते. सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणुका लढवल्या. त्यावेळी जनतेने १७० बहुमत दिले. परंतु ज्यांना बहुमत मिळाले नाही त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आमच्यासोबत आले त्यांनी बाळासाहेब, नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून आले होते. शरद पवार, राहुल गांधींचे फोटो लावून निवडून आले नव्हते. सुप्रीम कोर्ट अपात्रतेबाबत निर्णय घेऊ शकत नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंकडून १३ मागण्या करण्यात आल्या त्यातील एकही मागणी मंजूर करण्यात आली नाही. लोकांनी निवडून दिलेले सरकारच पुन्हा सत्तेवर आले. राष्ट्रवादी सरकारमध्ये शिवसेना आमदारांना स्कोप देत नव्हती असा आरोप आमदारांचा होता. त्यामुळे ते आमदार आमच्यासोबत आले असं फडणवीसांनी सांगितले.

ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र पिछाडीवर गेला

भारतीय रेल्वेने कोविड काळात सर्वात जास्त काम केले. भारतातील रस्ते मोठ्या प्रमाणात कोविड काळात बांधले गेले. भारतात गुंतवणूक आली. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र नंबर १ होता. आमच्या राज्यात गुंतवणूक जास्त होती.  आमचे सरकार गेल्यानंतर पहिल्यावर्षी गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक नंबर वन झाले. परंतु आमचे सरकार आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर १ झाला. उद्धव ठाकरेंच्या काळात केंद्राकडे राज्य सरकारचे योगदान दिले जात नव्हते. भांडणामुळे विकासकामे रखडवली. मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ २ वेळा मंत्रालयात गेले हे शरद पवारांनी म्हटलं. अशाप्रकारे सरकार चालत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री