शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झालाय - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:25 IST

गृहखाते असो वा अनेक गोष्टींबाबत दिल्लीतून कारभार चालवला जातो अशी टीका राऊतांनी केली.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचा कारभार हा महाराष्ट्रातून चालत नसून तो दिल्लीतून चालतोय. सगळेच निर्णय, मग ते राजकीय असतील किंवा अन्य काही, अगदी पोलीस स्टेशनलाही दिल्लीतून फोन येतो आणि मंत्री-उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसते. कुणावर कारवाई करायची, कुणावर नाही, कुणाला सोडायचे, कुणाला अडकवायचे हे दिल्लीतून ठरते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांचे २ उपमुख्यमंत्री दिल्लीत कायमचे राहिले तरी महाराष्ट्राला फारसा फरक पडत नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज आहे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून जे राजकारण आहे त्यात एका कर्तबगार नेत्याला त्यांच्या २ ज्युनिअरच्या हाताखाली काम करावे लागतंय ही अस्वस्था आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टींचे विस्मरण होतंय. गृहखाते ते चालवतायेत असं मला वाटत नाही. गृहखाते असो वा अनेक गोष्टींबाबत दिल्लीतून कारभार चालवला जातो. महाराष्ट्र हा दिल्लीचा दास किंवा गुलाम झालाय, महाराष्ट्र दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालंय असं आम्ही म्हणतोय ते यासाठीच असं त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्र जातीपातीत तुटला जाऊ नये ही आमची भूमिका

मराठा आरक्षणाबाबत राज्यात जो प्रश्न निर्माण झालाय त्याबाबत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या बैठकीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय. वेळ मिळाला तर मी स्वत: अन्यथा शिवसेनेचा महत्त्वाचा नेता या बैठकीला उपस्थित राहील. आक्रमक भाषा  टाळायला हवी. महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती अस्थिर आहे. भुजबळ हे एका समाजाचे नेतृत्व अनेक वर्ष करतायेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी संघर्ष करतायेत. हे दोन्ही समाज महाराष्ट्राचे प्रमुख घटक आहेत. राजकारणात जातपात राहू नये ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्र जातीपातीत तुटला जाऊ नये ही उद्धव ठाकरेंची आणि शिवसेनेची भूमिका आहे असं राऊतांनी स्पष्ट केले. 

दिल्लीतील I.N.D.I.A आघाडीची बैठक निर्णायक

इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत १९ डिसेंबरला होत आहे. सर्व घटक पक्षांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निमंत्रण पाठवले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतर सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहतील. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. परंतु तो कार्यक्रम आटोपून ते बैठकीला येतील. उद्धव ठाकरे दिल्लीत येतील. आज मुक्काम करतील. उद्या केजरीवाल यांच्यासोबतही उद्धव ठाकरेंची भेट आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीचे महत्त्व सर्व पक्षांना माहिती आहे. २०२४ च्या दृष्टीने इंडिया आघाडीची उद्याची बैठक निर्णायक ठरेल. चर्चा संवाद सुरू असून बैठकीत काही निर्णय घेतले जातील. लोकशाहीचे रक्षण करणे हा मुख्य अजेंडा आहे. काँग्रेस आणि घटक पक्षांत काही राज्यांमध्ये जागावाटपांबाबत समन्वयावर चर्चा होऊ शकते असं राऊतांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी