शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झालाय - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:25 IST

गृहखाते असो वा अनेक गोष्टींबाबत दिल्लीतून कारभार चालवला जातो अशी टीका राऊतांनी केली.

नवी दिल्ली - महाराष्ट्राचा कारभार हा महाराष्ट्रातून चालत नसून तो दिल्लीतून चालतोय. सगळेच निर्णय, मग ते राजकीय असतील किंवा अन्य काही, अगदी पोलीस स्टेशनलाही दिल्लीतून फोन येतो आणि मंत्री-उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसते. कुणावर कारवाई करायची, कुणावर नाही, कुणाला सोडायचे, कुणाला अडकवायचे हे दिल्लीतून ठरते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांचे २ उपमुख्यमंत्री दिल्लीत कायमचे राहिले तरी महाराष्ट्राला फारसा फरक पडत नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज आहे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून जे राजकारण आहे त्यात एका कर्तबगार नेत्याला त्यांच्या २ ज्युनिअरच्या हाताखाली काम करावे लागतंय ही अस्वस्था आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टींचे विस्मरण होतंय. गृहखाते ते चालवतायेत असं मला वाटत नाही. गृहखाते असो वा अनेक गोष्टींबाबत दिल्लीतून कारभार चालवला जातो. महाराष्ट्र हा दिल्लीचा दास किंवा गुलाम झालाय, महाराष्ट्र दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालंय असं आम्ही म्हणतोय ते यासाठीच असं त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्र जातीपातीत तुटला जाऊ नये ही आमची भूमिका

मराठा आरक्षणाबाबत राज्यात जो प्रश्न निर्माण झालाय त्याबाबत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या बैठकीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय. वेळ मिळाला तर मी स्वत: अन्यथा शिवसेनेचा महत्त्वाचा नेता या बैठकीला उपस्थित राहील. आक्रमक भाषा  टाळायला हवी. महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती अस्थिर आहे. भुजबळ हे एका समाजाचे नेतृत्व अनेक वर्ष करतायेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी संघर्ष करतायेत. हे दोन्ही समाज महाराष्ट्राचे प्रमुख घटक आहेत. राजकारणात जातपात राहू नये ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्र जातीपातीत तुटला जाऊ नये ही उद्धव ठाकरेंची आणि शिवसेनेची भूमिका आहे असं राऊतांनी स्पष्ट केले. 

दिल्लीतील I.N.D.I.A आघाडीची बैठक निर्णायक

इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत १९ डिसेंबरला होत आहे. सर्व घटक पक्षांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निमंत्रण पाठवले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतर सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहतील. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. परंतु तो कार्यक्रम आटोपून ते बैठकीला येतील. उद्धव ठाकरे दिल्लीत येतील. आज मुक्काम करतील. उद्या केजरीवाल यांच्यासोबतही उद्धव ठाकरेंची भेट आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीचे महत्त्व सर्व पक्षांना माहिती आहे. २०२४ च्या दृष्टीने इंडिया आघाडीची उद्याची बैठक निर्णायक ठरेल. चर्चा संवाद सुरू असून बैठकीत काही निर्णय घेतले जातील. लोकशाहीचे रक्षण करणे हा मुख्य अजेंडा आहे. काँग्रेस आणि घटक पक्षांत काही राज्यांमध्ये जागावाटपांबाबत समन्वयावर चर्चा होऊ शकते असं राऊतांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी