शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक; उद्धव ठाकरेंचे देवेंद्रंच्या पाठीत वारावर प्रत्युत्तर, संघाची स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 19:18 IST

Uddhav Thackeray in Nagpur speech: इथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातो. त्याचे पैसे ठेवले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर तो दागिने गहाण ठेवतो, शेत गहाण ठेवतो पण या गृहमंत्र्यांच्या गावात कट्टा गहाण ठेवला जातोय, अशी टीका ठाकरे यांनी केली.

मी जाहीर सभा घेणार नाहीय. उन्हाळ्याच मुंबईच्या बाजुला एक घटना घडली. महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी धर्माचा आधार घेत सभा घेतली. हे मोठे लोक थंडगार वाऱ्यात होते, पण जनता उन्हात होती. त्यात १४-१५ लोक गेले. मी तेवढा वाईट नाहीय. आपल्याला सभा घ्यायचीय पण आता पाऊस आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. नागपुरात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी आणि फडणवीसांवर टीका केली. पाठीत वार केल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले.  

इथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातो. त्याचे पैसे ठेवले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर तो दागिने गहाण ठेवतो, शेत गहाण ठेवतो पण या गृहमंत्र्यांच्या गावात कट्टा गहाण ठेवला जातोय. काय परिस्थिती आहे. फडणवीस उपमुख्यमंत्री पण त्यांच्यावर काय बोलायचे. त्यांची हालत अशी विचित्र झालीय की सहनही होत नाहीय. काय झालेय असे विचारले तर काही नाही काही नाही असे सांगतात. पण झालेय काहीतरी नक्की. मी पुन्हा येईन असे बोललो होतो. मी एकटा नाही आलोय, दोघांना घेऊन आलोय असे फडणवीस म्हणाले होते. मी त्यांची एक क्लिप दाखवतो असे सांगत नाही नाही नाही... एकवेळ लग्न करणार नाही... या भाषणांच्या क्लिप दाखविल्या. यानंतर फडणवीस यांना नागपुरला लागलेला कलंक आहे, असे ते म्हणाले. 

२०१४ ते १९ तुमच्यासोबत सत्तेत होतो, त्यावेळा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून निरोप आले नव्हते का? पण जे करायचे ते उघड करायचे. २०१४ साली असे काय घडले होते, की तुम्ही युती तोडली? मला आजही आठवतेय. मातोश्री गजबजलेली होती. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास एकनाथ खडसेंचा फोन आला, आपले काही जुळेल असे वाटत नाहीय. आमच्या लोकांची इच्छा आहे की शिवसेनेबरोबर राहू नये. आम्ही ठरवलेय, असे खडसे म्हणाले होते. तेव्हा युती का तोडली, असा सवाल फडणवीसांना केला. 

पाठीत वार करण्याची तुमची औलाद होती. युती आम्ही नाही तोडली. हिंदुत्वाच्या पायवर कुऱ्हाड ही भाजपाने तेव्हा मारली होती. मी टोमणा मारत नाही, तळमळीने बोलतोय. नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. संघाला १०० वर्षे होतील. भाजपा जे करतेय हे आरएसएसला मान्य आहे का? आरएसएस आणि भाजपाचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी खस्ता खाल्ल्या, काहींनी तर लग्न केले नाही. एकीकडे ते आणि ही लोकं, एवढी कशी काय बदलू शकतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. याचबरोबर उद्धव ठाकरेंनी संघाच्या काही लोकांचे कौतुकही केले. 

हे कोणाचे ओझे तुम्ही वाहताय, एवढ्यासाठी आरएसएसने काम केलेय का, अविवाहीत राहिले का? जिथे भाजपा शून्य होती तिथे आता पुन्हा शून्य होणार आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहात, त्यांच्या कुटुंबाची निंदा करायची आणि वाट लावायची, पुढे त्याच लोकांना भाजपा सोबत घेत मंत्रिपद द्यायचे. इतर पक्षांतले गद्दार घेतलेत पक्ष वाढवताय, पण ही गद्दारी हिंदुत्वाशी आहे. ज्याच्या विरोधात मी लढलो त्याला भाजपात घेत आहेत, असे आता कार्यकर्ते म्हणत आहेत, असा आरोप ठाकरे यांनी केला. 

महाराष्ट्रातली २०१४ ला युती तोडली, १९ ला विश्वासघात केला. आता भगव्याशी गद्दारी केलीय. ही गद्दारी प्रभू रामाशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी आहे. बाळासाहेबांचा फोटो लावला की बाळासाहेब सोबत आले असे नाही, ते तर समोर बसलेत. महाराष्ट्रात मोदींचे नाणे चालत नाही, तसेच कर्नाटकात झाले. त्यांना हनुमानाचे नाव घ्यावे लागले. बाबरीवेळी एकमेव बाळासाहेब ठाकरे होते, राम मंदिर, अमरनाथ यात्रा यावर बोलणारे कोण होते, असा सवाल ठाकरे यांनी केला. हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणारी पार्टी चार दिवसांत एकदम सरप्ट झाली. आता ही भ्रष्टाचारी माणसे मांडीला मांडी लावून बसलेली, ज्यांच्यासमोर तुम्ही बोलला त्या कार्यकर्त्यांनी आता करायचे काय? असा खोचक सवाल ठाकरेंनी केला. आता भाजपाचे भ्रष्ट जनता पार्टी असे नाव करावे, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ