शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

महिंद्राचा प्रकल्प गुजरातला जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, "इथल्या गुंतवणूकदारांना त्रास देऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 18:46 IST

महाराष्ट्रातील आणखी एक उद्योग गुजरातला जाणार असा आरोप करणाऱ्या विरोधकांना देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis : राज्यातील विविध प्रकल्प हे परराज्यात गेल्यावरुन महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच  महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीने चीनच्या कंपनीसोबत २५ हजार कोटींचा करार करुन हा प्रकल्प नाशिकऐवजी गुजरातला उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उद्योगांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. 

महिंद्रा अँण्ड महिंद्रा हा प्रकल्प गुजरामध्ये जाणार नसल्याचे स्पष्टीकरण स्वतः महिंद्रा यांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अकोल्यात भाजपच्या महामेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते.  मविआच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला होता पण पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम महायुती सरकारने केल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वेदांता-फॉक्सकॉन, मुंबईतील मोठा हिरे उद्योग, टाटा-एअरबस असे प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने चीनमधील शानक्सी कंपनीशी कार निर्मितीचा २५ हजार कोटींचा करार केला असून हा प्रकल्प नाशिकऐवजी गुजरातला उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यात केंद्र सरकारच्या मंजुरीचे गौडबंगाल असल्याची चर्चा असून हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्यास हजारो नोकऱ्याही गमवाव्या लागणार आहेत, असेही विरोधकांनी म्हटलं होतं.

"आता हे इतके खोटारडे लोक आहे. काल एका विदेशी संस्थेने महाराष्ट्रातील महिंद्राचा उद्योग गुजरातला जाणार असे सांगितले. त्यानंतर लगेच इको सिस्टम सुरु झाली. उद्धव ठाकरे, नाना पटोले याविषयी बोलले. सुदैवाने संध्याकाळी महिंद्रा अँण्ड महिंद्रा यांनीच संध्याकाळी सांगितले की आम्ही कुठेही जाणार नाहीत. याऊलट पुण्यात दहा हजार कोटींची, नाशिकमध्ये २४ हजार कोटींची आणि विदर्भात १२०० कोटींची गुंतवणूक करतो आहोत. आम्ही जी गुंतवणूक करतो आहोत ती महाराष्ट्रात करत आहोत. महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. हे रोज महाराष्ट्राला बदनाम करतात. रोज इथल्या गुंतवणूकदारांना त्रास देतात. मविआच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेला होता. पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केलं," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahindraमहिंद्राUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोले