शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्राचा प्रकल्प गुजरातला जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, "इथल्या गुंतवणूकदारांना त्रास देऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 18:46 IST

महाराष्ट्रातील आणखी एक उद्योग गुजरातला जाणार असा आरोप करणाऱ्या विरोधकांना देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis : राज्यातील विविध प्रकल्प हे परराज्यात गेल्यावरुन महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच  महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीने चीनच्या कंपनीसोबत २५ हजार कोटींचा करार करुन हा प्रकल्प नाशिकऐवजी गुजरातला उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उद्योगांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. 

महिंद्रा अँण्ड महिंद्रा हा प्रकल्प गुजरामध्ये जाणार नसल्याचे स्पष्टीकरण स्वतः महिंद्रा यांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अकोल्यात भाजपच्या महामेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते.  मविआच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला होता पण पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम महायुती सरकारने केल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वेदांता-फॉक्सकॉन, मुंबईतील मोठा हिरे उद्योग, टाटा-एअरबस असे प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने चीनमधील शानक्सी कंपनीशी कार निर्मितीचा २५ हजार कोटींचा करार केला असून हा प्रकल्प नाशिकऐवजी गुजरातला उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यात केंद्र सरकारच्या मंजुरीचे गौडबंगाल असल्याची चर्चा असून हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्यास हजारो नोकऱ्याही गमवाव्या लागणार आहेत, असेही विरोधकांनी म्हटलं होतं.

"आता हे इतके खोटारडे लोक आहे. काल एका विदेशी संस्थेने महाराष्ट्रातील महिंद्राचा उद्योग गुजरातला जाणार असे सांगितले. त्यानंतर लगेच इको सिस्टम सुरु झाली. उद्धव ठाकरे, नाना पटोले याविषयी बोलले. सुदैवाने संध्याकाळी महिंद्रा अँण्ड महिंद्रा यांनीच संध्याकाळी सांगितले की आम्ही कुठेही जाणार नाहीत. याऊलट पुण्यात दहा हजार कोटींची, नाशिकमध्ये २४ हजार कोटींची आणि विदर्भात १२०० कोटींची गुंतवणूक करतो आहोत. आम्ही जी गुंतवणूक करतो आहोत ती महाराष्ट्रात करत आहोत. महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. हे रोज महाराष्ट्राला बदनाम करतात. रोज इथल्या गुंतवणूकदारांना त्रास देतात. मविआच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेला होता. पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केलं," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahindraमहिंद्राUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोले