शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

फडणवीसांच्या शुभेच्छा अन् राष्ट्रवादीच्या पोटात गोळा! एका विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 10:10 IST

राज्याच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सोमवारी शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध करत मोठी लढाई जिंकली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली.

मुंबई-

राज्याच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सोमवारी शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध करत मोठी लढाई जिंकली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली. यानंतर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्याही नावाची घोषणा झाली. विरोधी पक्षनेता म्हणजे शॅडो मुख्यमंत्रीच म्हणून ओळखला जातो. अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाच्या प्रस्तावात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. या भाषणात फडणवीसांनी अजित पवारांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलंच, पण एका विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग!

फडणवीसांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या पण त्यांनी अजित पवार कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असं वाटत नसल्याची इच्छा व्यक्त करुन सर्वांना धक्का दिला. "खरं म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे की विरोधी पक्षनेत्याचं वर्णन करताना तुम्ही खूप चांगले विरोधी पक्षनेते आहात त्यामुळे तुम्ही कायम तिथं राहावं असं म्हटलं जातं. पण मी हे लोकशाहीत मान्य करत नाही. मला असं वाटत नाही. तुमच्या मनात तुम्हाला जिथं जायचं आहे त्याचा प्रयत्न तुम्ही नक्की कराल. त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. दादा तिथं कायम राहावेत असं वाटत नाही. पण जोपर्यंत तुम्ही त्या पदावर आहात त्याला न्याय जरूर द्यावा एवढं मी नक्की यावेळी सांगेन", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आणखी ३-४ आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार?

अजित पवार यांच्याबाबत सत्ताधारी पक्षातून ज्यांनी ज्यांनी भाषण केलं त्या सर्वांनीच त्यांच्या कामाचं कौतुक केलं. पण त्यातही फडणवीसांनी केलेल्या कौतुकानं सर्वांचं लक्ष वेधन घेतलं. त्यामुळे फडणवीस आणि अजित पवार यांचं ट्युनिंग उत्तम आहे. हे समीकरण भविष्यात केव्हाही दिसू शकतं असंच चित्र पाहायला मिळाला. त्यामुळे फडणवीसांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पोटात गोळा आला असेल एवढं मात्र नक्की.

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना त्यांनी सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं असल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसंच अनेकदा मुख्यमंत्रीपदानं हुलकावणी दिल्याचंही नमूद केलं. पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला आणि त्यावेळी जे झालं ते तसंच राहिलं असतं तर अजित पवार देखील नक्कीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले असते असंही बोलून दाखवलं. इतकंच नव्हे, तर आजही तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खासगीत विचारलं तर अजित पवारांनी जे पाऊल उचललं होतं ते योग्यच होतं असंच तुम्हाला कळेल असा टोला फडणवीसांनी जयंत पाटील यांना लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार