शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

फडणवीसांच्या शुभेच्छा अन् राष्ट्रवादीच्या पोटात गोळा! एका विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 10:10 IST

राज्याच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सोमवारी शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध करत मोठी लढाई जिंकली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली.

मुंबई-

राज्याच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सोमवारी शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध करत मोठी लढाई जिंकली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली. यानंतर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्याही नावाची घोषणा झाली. विरोधी पक्षनेता म्हणजे शॅडो मुख्यमंत्रीच म्हणून ओळखला जातो. अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाच्या प्रस्तावात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. या भाषणात फडणवीसांनी अजित पवारांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलंच, पण एका विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग!

फडणवीसांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या पण त्यांनी अजित पवार कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असं वाटत नसल्याची इच्छा व्यक्त करुन सर्वांना धक्का दिला. "खरं म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे की विरोधी पक्षनेत्याचं वर्णन करताना तुम्ही खूप चांगले विरोधी पक्षनेते आहात त्यामुळे तुम्ही कायम तिथं राहावं असं म्हटलं जातं. पण मी हे लोकशाहीत मान्य करत नाही. मला असं वाटत नाही. तुमच्या मनात तुम्हाला जिथं जायचं आहे त्याचा प्रयत्न तुम्ही नक्की कराल. त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. दादा तिथं कायम राहावेत असं वाटत नाही. पण जोपर्यंत तुम्ही त्या पदावर आहात त्याला न्याय जरूर द्यावा एवढं मी नक्की यावेळी सांगेन", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आणखी ३-४ आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार?

अजित पवार यांच्याबाबत सत्ताधारी पक्षातून ज्यांनी ज्यांनी भाषण केलं त्या सर्वांनीच त्यांच्या कामाचं कौतुक केलं. पण त्यातही फडणवीसांनी केलेल्या कौतुकानं सर्वांचं लक्ष वेधन घेतलं. त्यामुळे फडणवीस आणि अजित पवार यांचं ट्युनिंग उत्तम आहे. हे समीकरण भविष्यात केव्हाही दिसू शकतं असंच चित्र पाहायला मिळाला. त्यामुळे फडणवीसांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पोटात गोळा आला असेल एवढं मात्र नक्की.

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना त्यांनी सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं असल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसंच अनेकदा मुख्यमंत्रीपदानं हुलकावणी दिल्याचंही नमूद केलं. पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला आणि त्यावेळी जे झालं ते तसंच राहिलं असतं तर अजित पवार देखील नक्कीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले असते असंही बोलून दाखवलं. इतकंच नव्हे, तर आजही तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खासगीत विचारलं तर अजित पवारांनी जे पाऊल उचललं होतं ते योग्यच होतं असंच तुम्हाला कळेल असा टोला फडणवीसांनी जयंत पाटील यांना लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार