शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या शुभेच्छा अन् राष्ट्रवादीच्या पोटात गोळा! एका विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 10:10 IST

राज्याच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सोमवारी शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध करत मोठी लढाई जिंकली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली.

मुंबई-

राज्याच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सोमवारी शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध करत मोठी लढाई जिंकली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली. यानंतर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्याही नावाची घोषणा झाली. विरोधी पक्षनेता म्हणजे शॅडो मुख्यमंत्रीच म्हणून ओळखला जातो. अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाच्या प्रस्तावात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. या भाषणात फडणवीसांनी अजित पवारांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलंच, पण एका विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग!

फडणवीसांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या पण त्यांनी अजित पवार कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असं वाटत नसल्याची इच्छा व्यक्त करुन सर्वांना धक्का दिला. "खरं म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे की विरोधी पक्षनेत्याचं वर्णन करताना तुम्ही खूप चांगले विरोधी पक्षनेते आहात त्यामुळे तुम्ही कायम तिथं राहावं असं म्हटलं जातं. पण मी हे लोकशाहीत मान्य करत नाही. मला असं वाटत नाही. तुमच्या मनात तुम्हाला जिथं जायचं आहे त्याचा प्रयत्न तुम्ही नक्की कराल. त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. दादा तिथं कायम राहावेत असं वाटत नाही. पण जोपर्यंत तुम्ही त्या पदावर आहात त्याला न्याय जरूर द्यावा एवढं मी नक्की यावेळी सांगेन", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आणखी ३-४ आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार?

अजित पवार यांच्याबाबत सत्ताधारी पक्षातून ज्यांनी ज्यांनी भाषण केलं त्या सर्वांनीच त्यांच्या कामाचं कौतुक केलं. पण त्यातही फडणवीसांनी केलेल्या कौतुकानं सर्वांचं लक्ष वेधन घेतलं. त्यामुळे फडणवीस आणि अजित पवार यांचं ट्युनिंग उत्तम आहे. हे समीकरण भविष्यात केव्हाही दिसू शकतं असंच चित्र पाहायला मिळाला. त्यामुळे फडणवीसांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पोटात गोळा आला असेल एवढं मात्र नक्की.

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना त्यांनी सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं असल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसंच अनेकदा मुख्यमंत्रीपदानं हुलकावणी दिल्याचंही नमूद केलं. पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला आणि त्यावेळी जे झालं ते तसंच राहिलं असतं तर अजित पवार देखील नक्कीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले असते असंही बोलून दाखवलं. इतकंच नव्हे, तर आजही तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खासगीत विचारलं तर अजित पवारांनी जे पाऊल उचललं होतं ते योग्यच होतं असंच तुम्हाला कळेल असा टोला फडणवीसांनी जयंत पाटील यांना लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार