शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

फडणवीसांनी आमदारकी दिली नाही, शिवसेनेवर प्रेम असणाऱ्या माजी आमदाराचा भाजपला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 15:56 IST

बावनकुळेंच्या १०० आले तर ५ जातील आणि ९५ राहतील या वक्तव्यानंतर भाजपात आपली गरज राहिली नाही- रमेश कुथेंचा गंभीर आरोप

२०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीचे तिकीट देण्याचा शब्द देऊनही तो पाळला नाही. बावनकुळेंच्या १०० आले तर ५ जातील आणि ९५ राहतील या वक्तव्यानंतर भाजपात आपली गरज राहिली नाही, असा आरोप करत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपाला रामराम केला आहे. कुथे हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. 

रमेश कुथे हे शिवसेनेत असताना गोंदियाचे आमदार होते. सहा वर्षांपूर्वी कुथे यांनी भाजपात प्रवेश केला होता. २०१९ मध्ये पक्ष प्रवेश करताना आमदारकी देण्याच्या आश्वासनावर त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले होते. पण पूर्ण केले नाही. पक्षात नवीन लोक येतात त्यांना सन्मान मिळत नाही, असा आरोप कुथे यांनी केला आहे. 

नागपूरच्या देशपांडे सभागृहात पूर्व विदर्भाताल सर्व लोकसभेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले होते. येणाऱ्यांच्या मागण्या ही आहेत. जे येतात त्यांना हो बोला, जे मागतात त्यांना हो बोला. पण आपण सर्वांना खुश करू शकत नाही.  100 येतील आणि पाच परत जातील. ते पाच गेले तरी आपण 95 ने पुढेच राहू असे बावनकुळे म्हणाले होते. त्या दिवशी मला असे वाटले की या पक्षामध्ये आपली काही गरज नाही, असे कुथे यांनी स्पष्ट केले.  

भारतीय जनता पार्टी ही ओबीसींच्या विरोधात आहे. त्यांच्या हिताचे काही बोलत नाही. मराठा युद्ध असो, ओबीसी युद्ध असो हे दोघेही तव्यावर हात ठेवतात. नाना पटोले माझ्या घरी आले होते तेव्हा माझे डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. ते म्हणाले की, आमच्या सोबत या. मी म्हणालो विचार करतो आणि सांगतो. कार्यकर्त्यांची इच्छा होती लवकरात लवकर भाजप पक्षाला तुम्ही सोडा. यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. माझे शिवसेनेवर प्रेम आहे आणि मी त्यांच्या भुमिकेवर काही बोलू शकत नाही, असेही कुथे म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना