शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 06:37 IST

साटम यांनी विरोधकांवर डागलेली तोफ पाहून भाजपत हा नवा ब्रँड उदयास आल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपने आणला नवा ‘ब्रँड’  

मुंबई भाजपच्या नेतृत्वातील बदलानंतर झालेला विजय संकल्प मेळावा हा महापालिका रणांगणाची पहिली चुणूक होती. आ. अमित साटम यांच्या हाती मुंबई भाजपची सूत्रे देऊन पक्षाने संघटनेला आक्रमक व तरुण चेहरा दिला आहे. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आणि विरोधकांना भिडण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अमित कर्तृत्वाने पुढे आला, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना टोला होता. फडणवीस यांनी ठाकरे ब्रँडचा उल्लेख करत टीका केली. त्याचवेळी आ. साटम यांनी विरोधकांवर डागलेली तोफ पाहून भाजपत हा नवा ब्रँड उदयास आल्याची चर्चा रंगली आहे.

‘आमचा तो ब्रँड, दुसऱ्याची ती ब्रँडी’

बेस्टच्या निवडणुकीत, ‘आमचा ब्रँड आहे’ असे म्हणणाऱ्यांचा ‘बॅण्ड वाजला’, अशा शब्दांत भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवसेनेवर टीका केली. यावर खा. संजय राऊत यांनी  पलटवार केला. फडणवीस यांना ठाकरे ‘ब्रँड’ची फार चिंता आहे. ती चिंता नसून भीती आहे. ठाकरे हाच ब्रँड आहे, असा पलटवार केला. फडणवीस सरकारमधील एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी ‘ब्रँडी’ असा उल्लेख केला. आतापर्यंत ‘आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हण ऐकिवात होती, आता ‘आमचा तो ब्रँड दुसऱ्याची ती ब्रँडी’ ही म्हण रुढ झाली तर आश्चर्य वाटायला नको.

...अन् विलासरावांची आठवण झाली

कल्याण डोंबिवलीमधील २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा विषय प्रलंबित असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. परंतु तरीही येथील महानगरपालिका आयुक्तांनी प्रभाग रचना करताना त्या गावांचा समावेश महापालिका हद्दीत केला. त्यावर संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी संतोष केणे यांनी थेट दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा दिला. देशमुख यांनी २७ गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती केल्या होत्या. तसे नेते होणे नाही, असे ते म्हणाले. केणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विषयाला पुन्हा हात घातल्याने त्याची चर्चा नक्कीच आहे. 

अर्थ खात्याचा झटका बसला...

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित असलेले मंत्री चंद्रकांत पाटील भाषणात म्हणाले, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विस्तारासाठी चिखली येथे २८ एकर जागा दिली आहे. त्यासाठी राज्य सरकार मदत करेल. त्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात केला. चंद्रकांतदादा सीओईपीला मदत करण्यासाठी खूप सावधपणे बोलले आहेत. कारण त्यांना अर्थ विभागाचा दोन ते तीनदा झटका बसला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला नसेल तर नवल.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेAmit Satamअमित साटमSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा