शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

भाजपचे आमदार फुटणार ही अस्वस्थतेतून पसरवलेली अफवा, देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 07:10 IST

Devendra Fadnavis : इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेले काही नेते पुन्हा मूळ पक्षात परतणार असल्याचा दावा केला जात असताना फडणवीस म्हणाले की, बाळासाहेब सानप भाजपमध्ये परतल्याने नव्या-जुन्यांचा वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सगळे एकदिलाने काम करतील.

मुंबई : सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता लक्षात आल्यानेच या पक्षांचे नेते भाजप आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र भाजपातून एकही आमदार फुटणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले.नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेले काही नेते पुन्हा मूळ पक्षात परतणार असल्याचा दावा केला जात असताना फडणवीस म्हणाले की, बाळासाहेब सानप भाजपमध्ये परतल्याने नव्या-जुन्यांचा वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सगळे एकदिलाने काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे. आगामी काळात तेथे भाजपचाच खासदार असेल, असेही ते म्हणाले.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, काही गैरसमजांमुळे बाळासाहेब सानप हे पक्षाबाहेर पडले होते. आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत. सानप यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पक्षाची जबाबदारी सोपविली जाईल. आता नाशिकमधील कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करावे. सानप यांनी पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू, सगळे एकोप्याने काम करतील, अशी ग्वाही दिली. माजी मंत्री गिरीश महाजन यांचेही भाषण झाले. माजी मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे आदी उपस्थित होते.

इतर पक्षातून आलेले नेते प्रगल्भइतर पक्षांतून आमच्याकडे आलेले नेते अतिशय प्रगल्भ आहेत. देशाला राहुल गांधी नाही तर नरेंद्र मोदीच सक्षम नेतृत्व देऊ शकतात याची त्यांना खात्री आहे. राज्याच्या राजकारणाची दिशा त्यांना कळते. कोणीही पक्ष सोडणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा