शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मंत्रिमंडळालाही उद्याच शपथ द्यायची की नाही, संध्याकाळी हायकमांड ठरविणार; रुपानींचे संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:17 IST

Devendra Fadnavis CM Oath News: नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाल्याचे रुपानी यांनी सांगितले. तसेच दुपारी ३ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत आज देवेंद्र फडणवीस यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आणि गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरु असलेल्या राजकारणाला विराम मिळाला आहे. थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याचे भाजपाचे निरीक्षक विजय रुपानी यांनी सांगितले. 

संसदीय नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाल्याचे रुपानी यांनी सांगितले. तसेच दुपारी ३ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांचा उद्या, सायंकाळी ५.३० वाजता शपथविधी आहे. महनीय व्यक्तींना निमंत्रण पत्रिकाही देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अशातच कोणाकोणाचा शपथविधी होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री की अन्य मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार यावरही रुपानी यांनी माहिती दिली आहे. 

अन्य मंत्रिमंडळाचा शपथविधी घेण्याबाबत आज सायंकाळी हायकमांडशी चर्चा केली जाणार आहे. यानंतर सर्व ठरणार आहे. परंतू, उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचे रुपानी यांनी स्पष्ट केले. यंदाचा शपथविधी सोहळा हा आझाद मैदानावर घेतला जाणार आहे. 

५ वर्षांनी ते पुन्हा आले!देवेंद्र फडणवीस हे राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. २०१४ साली फडणवीसांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. २०१४ ते २०१९ सलग ५ वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले होते. २०१९ च्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्या राजकीय घडामोडीत अजित पवारांनासोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. परंतु अवघ्या ७२ तासांत त्यांना मुख्यमंत्रि‍पदावरून पायउतार व्हावे लागले. २०१९ मध्ये फडणवीसांनी निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन, याच भूमिकेत, याच निर्धाराने अशी घोषणा केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या खेळीमुळे फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागले. त्यानंतरच्या काळात विरोधकांनी मी पुन्हा येईन घोषणेवरून फडणवीसांची खिल्ली उडवली परंतु आज ५ वर्षांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Rupaniविजय रूपाणीBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४