शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

व्होट जिहादमुळे भाजपला फटका बसल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा; आकडेवारीत वेगळीच माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:43 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या व्होट जिहादच्या दाव्याबाबत लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीतून वेगळी माहिती समोर आली आहे.

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. अशातच गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत व्होट जिहादचा उल्लेख केला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी १४ जागांवर फडणवीस यांनी व्होट जिहाद झाल्याचं म्हटलं होतं. मात्र आता लोकसभा निवडणुकीत महायुतीला व्होट जिहादचा सामना करावा लागला का याची आकडेवारी समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा व्होट जिहादचा दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पराभवासाठी व्होट जिहादला जबाबदार धरले. लोकसभा निवडणुकीदरम्यान मुस्लिम मतदारांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविरुद्ध एकत्रित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा दावा देवेंद्र फडणीवस यांनी केला होता. मात्र आता मतदानाची आकडेवारीतून वेगळीच माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मुस्लिम मतदारांचा मोठा भाग असलेल्या ३८ विधानसभा मतदारसंघातल्या अर्ध्याहून अधिक जागांच्या मतदानात वाढ झाल्याचे समोर आलं आहे. 

महायुतीची मुस्लिम मते वाढली

मतमोजणीच्या आकडेवारीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यापेक्षा वेगळी माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महायुतीला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा मोठा भाग असलेल्या ३८ विधानसभा मतदारासंघापैकी निम्म्याहून अधिकांमध्ये जास्त मते मिळवली आहेत. २० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेले महाराष्ट्रात विधानसभेचे ३८ मतदारसंघ आहेत. यापैकी २० मतदारसंघात भाजप आणि मित्रपक्षांची लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवल्याचे आकडेवारीतून समोर आलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा जागांपैकी या ३८ मतदारसंघांमध्ये मुस्लिम लोकसंख्या २० टक्के आहे. त्यातील नऊ मतदारसंघामध्ये  ४० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण ११.२४ कोटी लोकसंख्येपैकी १.३ कोटी मुस्लिम आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या ३८ जागांपैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी ११ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसने तीन आणि समाजवादी पार्टीने एआयएमआयएमने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.

या ३८ जागांवर मुस्लिम नागरिकांची संख्या जास्त असूनही, सध्याच्या विधानसभेत असलेल्या एकूण १० मुस्लिम आमदारांपैकी फक्त आठच या मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९च्या निवडणुकीत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या १० मतदारसंघांमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि सपा यांनी प्रत्येकी दोन जागा तर एआयएमआयएम आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्यांनी महायुतीच्या विरुद्ध मुस्लिम मतांच्या एकत्रीकरणाचा फटका बसल्याचे म्हटलं. याला भाजप नेत्यांनी व्होट जिहाद असे म्हटलं होतं.

महत्त्वाची बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार असलेल्या ३८ पैकी २० विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या रावेरमध्ये भाजपची सर्वाधिक २०.१३ टक्के मते वाढली आहेत. दुसरीकडे, मानखुर्द, भिवंडी पश्चिम, भायखळा, छत्रपती संभाजीनगर मध्य, अकोट, परभणी आणि बीड या मतदारसंघामध्ये महायुतीच्या मतांची टक्केवारी १० टक्क्यांनी घटली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुका वगळता भाजपने महाराष्ट्रात सर्व जागा लढवल्या तेव्हा ३८ मुस्लिमबहुल मतदारसंघांकडे फारसे लक्ष दिले नाही. २०१९ मध्ये भाजपने  ३८ पैकी फक्त १८ जागा लढवल्या आणि उरलेल्या शिवसेनेसह मित्रपक्षांना सोडल्या होत्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMuslimमुस्लीमlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४