शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिभेद करणाऱ्या फुटीरतावादी विचारांपासून सावध राहा : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 10:22 IST

देशात नक्षलवादी, माओवाद्यांनी सर्वात जास्त हत्या वनवासींच्या केल्या आहेत.

औरंगाबाद : तुमचे आरक्षण काढून घेतले जाईल, तुम्हाला या देशातून बाहेर काढले जाईल, असे फुटीरतेचे बीजारोपण काही राजकीय पक्ष मतासाठी करीत आहेत. या देशाची संस्कृती जतन करणाऱ्या व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान देणाऱ्या अदिवासी, वनवासी बांधवांनी बुद्धिभेद करणाऱ्या आणि फुटीरतावादी विचारधारेपासून सावध राहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

औरंगाबाद येथील अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न देवगिरी कल्याण आश्रमाचे वतीने कार्यकर्त्यांच्या महासमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, वनवासी म्हणजे मागासलेले असे म्हटले जाते. मात्र, या देशावर झालेले अनेक हल्ले परतविण्यासाठी या वनवाशांनी जिवाची बाजी लावत सशस्त्र लढा दिला असल्याचे ते म्हणाले.

तर स्वातंत्र्यलढ्यात वनवासींचे योगदान मोठे आहे. अनेक हल्ले होत असताना त्यांनी आपली संस्कृती, बोली भाषा जतन करून ठेवली. पर्यावरणाला, निसर्गाला मित्र मानून जीवन जगत आहे. खऱ्या अर्थाने वनवासी हे मागासलेले नव्हे तर विचाराने प्रगत आहेत. मात्र, याच देशात या वनवासींना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले असल्याचेही फडणवीस म्हणाले.

देशाच्या मुख्य प्रवाहात आणल्या शिवाय आदिवासी, वनवासी समाजाची प्रगती होणार नाही. या समाजाची प्रगती झाली नाही तर देशाची प्रगती होणार नाही. तर देशात नक्षलवादी, माओवाद्यांनी सर्वात जास्त हत्या वनवासींच्या केल्या आहेत. देशात फूट पाडणाऱ्या आणि तुकडे करू पाहणाऱ्या लोकांना थांबवायचे असल्यास तंट्या भिल्ल आणि बिरसा मुंडांचा इतिहास देशातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.