शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

बुद्धिभेद करणाऱ्या फुटीरतावादी विचारांपासून सावध राहा : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 10:22 IST

देशात नक्षलवादी, माओवाद्यांनी सर्वात जास्त हत्या वनवासींच्या केल्या आहेत.

औरंगाबाद : तुमचे आरक्षण काढून घेतले जाईल, तुम्हाला या देशातून बाहेर काढले जाईल, असे फुटीरतेचे बीजारोपण काही राजकीय पक्ष मतासाठी करीत आहेत. या देशाची संस्कृती जतन करणाऱ्या व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान देणाऱ्या अदिवासी, वनवासी बांधवांनी बुद्धिभेद करणाऱ्या आणि फुटीरतावादी विचारधारेपासून सावध राहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

औरंगाबाद येथील अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न देवगिरी कल्याण आश्रमाचे वतीने कार्यकर्त्यांच्या महासमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, वनवासी म्हणजे मागासलेले असे म्हटले जाते. मात्र, या देशावर झालेले अनेक हल्ले परतविण्यासाठी या वनवाशांनी जिवाची बाजी लावत सशस्त्र लढा दिला असल्याचे ते म्हणाले.

तर स्वातंत्र्यलढ्यात वनवासींचे योगदान मोठे आहे. अनेक हल्ले होत असताना त्यांनी आपली संस्कृती, बोली भाषा जतन करून ठेवली. पर्यावरणाला, निसर्गाला मित्र मानून जीवन जगत आहे. खऱ्या अर्थाने वनवासी हे मागासलेले नव्हे तर विचाराने प्रगत आहेत. मात्र, याच देशात या वनवासींना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले असल्याचेही फडणवीस म्हणाले.

देशाच्या मुख्य प्रवाहात आणल्या शिवाय आदिवासी, वनवासी समाजाची प्रगती होणार नाही. या समाजाची प्रगती झाली नाही तर देशाची प्रगती होणार नाही. तर देशात नक्षलवादी, माओवाद्यांनी सर्वात जास्त हत्या वनवासींच्या केल्या आहेत. देशात फूट पाडणाऱ्या आणि तुकडे करू पाहणाऱ्या लोकांना थांबवायचे असल्यास तंट्या भिल्ल आणि बिरसा मुंडांचा इतिहास देशातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.