शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

बुद्धिभेद करणाऱ्या फुटीरतावादी विचारांपासून सावध राहा : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 10:22 IST

देशात नक्षलवादी, माओवाद्यांनी सर्वात जास्त हत्या वनवासींच्या केल्या आहेत.

औरंगाबाद : तुमचे आरक्षण काढून घेतले जाईल, तुम्हाला या देशातून बाहेर काढले जाईल, असे फुटीरतेचे बीजारोपण काही राजकीय पक्ष मतासाठी करीत आहेत. या देशाची संस्कृती जतन करणाऱ्या व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान देणाऱ्या अदिवासी, वनवासी बांधवांनी बुद्धिभेद करणाऱ्या आणि फुटीरतावादी विचारधारेपासून सावध राहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

औरंगाबाद येथील अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न देवगिरी कल्याण आश्रमाचे वतीने कार्यकर्त्यांच्या महासमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, वनवासी म्हणजे मागासलेले असे म्हटले जाते. मात्र, या देशावर झालेले अनेक हल्ले परतविण्यासाठी या वनवाशांनी जिवाची बाजी लावत सशस्त्र लढा दिला असल्याचे ते म्हणाले.

तर स्वातंत्र्यलढ्यात वनवासींचे योगदान मोठे आहे. अनेक हल्ले होत असताना त्यांनी आपली संस्कृती, बोली भाषा जतन करून ठेवली. पर्यावरणाला, निसर्गाला मित्र मानून जीवन जगत आहे. खऱ्या अर्थाने वनवासी हे मागासलेले नव्हे तर विचाराने प्रगत आहेत. मात्र, याच देशात या वनवासींना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले असल्याचेही फडणवीस म्हणाले.

देशाच्या मुख्य प्रवाहात आणल्या शिवाय आदिवासी, वनवासी समाजाची प्रगती होणार नाही. या समाजाची प्रगती झाली नाही तर देशाची प्रगती होणार नाही. तर देशात नक्षलवादी, माओवाद्यांनी सर्वात जास्त हत्या वनवासींच्या केल्या आहेत. देशात फूट पाडणाऱ्या आणि तुकडे करू पाहणाऱ्या लोकांना थांबवायचे असल्यास तंट्या भिल्ल आणि बिरसा मुंडांचा इतिहास देशातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.