शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

'या' मतदारासंघावर जास्त लक्ष देणार-देवेंद्र फडणवीस; भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 17:17 IST

"फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचे आहे. राज्यातील सर्व 48 जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार."

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीला अजून 2 वर्षे बाकी आहेत. पण, भाजपकडून या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत सूचक विधान केले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजप तयारी करत असून, सध्या ताब्यात नसलेल्या मतदारासंघावर जास्त लक्ष देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

'त्या जिल्ह्यात जास्त लक्ष देणार'आज भाजप नेत्यांची बैठक पार पडली, यात आगामी निवडणुकांवर चर्चा झाली. यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन 48' ची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, "आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काम कस करायचं, त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचे आहे. राज्यात असलेल्या 48 पैकी 48 लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेषतः ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला, त्या ठिकाणी जास्त लक्ष दिले जाईल," अशी माहिती फडणवीसांनी दिली.

'काँग्रेसचे आंदोलन चुकीचे'यावेली फडणवीसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीच्या कारवाईवरुन देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरही भाष्य केले. "खासदार राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन करणे चुकीचे आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचा परवाना देशात कुणाला नाही. चौकशीवेळी तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचे काम काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून करतंय. एजीएलची संपत्ती गांधी कुटुंबाने लाटली असा आरोप त्यांच्यावर आहे,'' असं फडणवीस यांनी म्हणाले. 

'MIM ही शिवसेनेची बी टीम '"MIM ने शिवसेनेला मतदान करून उमेदवाराला निवडून आणलं आहे. MIM शिवसेनेची बी टीम आहे हे सिद्ध झाले आहे. ए टीमला मदत होणारी वक्तव्य जलील करत आहेत. भाजपा कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. भाजपा पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे," असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी जलील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक