शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

Devendra Fadanvis: राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी किती इच्छुक? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आकडा ऐकून येईल आकडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 19:21 IST

Devendra Fadanvis: मविआ सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या आणि राज्यपालांनी रोखून धरलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्येही आता बदल होणार आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

मुंबई - गेल्या महिन्यात राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात सत्तांतर झालं होतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यानंतर मविआ सरकारने घेतलेले अनेक निर्णयही बदलण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावला आहे. दरम्यान, मविआ सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या आणि राज्यपालांनी रोखून धरलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्येही आता बदल होणार आहे. तसेच शिंदेगट आणि भाजपाकडून नव्या १२ जणांची यादी दिली जाणार आहे. आता या १२ आमदारांमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी भाजपामधील अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे १२ आमदार आहेत. आता या १२ आमदारपदांसाठी पात्र २०० लोक या सभागृहात आहेत. तर आतापर्यंत १२०० लोक मला बायोडाटा देऊन गेले आहेत. पण जे काही नियमात असेल त्याचं पालन करून, राज्यपालांचं समाधान झालं पाहिजे, अशा नियमांचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यातील काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. काही जागा आपल्याला मिळतील. भाजपामध्ये जी पद्धत आहे त्याप्रमाणे नियुक्त्या होतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपल्यापैकी अनेकांना वाटेल, याला घेतलं, माझ्यात काय कमी आहे. मी सुद्धा खूप काम केलंय. असं वाटणं साहजिक आहे. कारण प्रत्येकजण खूप काम करतोय, संघर्ष प्रत्येकाने केलाय. मात्र एकावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांना देता येत नाहीत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, पुढची अडीच वर्ष ही पुन्हा एकदा आपली घडी नीट बसवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यामुळे या काळात आपली एकजूट महत्त्वाची आहे. कुणी नाराज होण्याचं कारण नाही. ती नाराजी दूर करून एका मोठ्या लक्ष्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या पैकी कुणीही भाजपामध्ये सत्ता मिळवण्यासाठी आलेलो नाही आहोत. जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतात. जे पक्ष विचारांवर चालले तोपर्यंत चाललेत, ज्यावेळी विचारांऐवजी ते सत्तालोलूप झाले तेव्हा ते पक्ष संपलेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनंचं नाव न घेता लगावला.

ते पुढे म्हणाले की, भाजपामध्ये सामान्यातीला सामान्य प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान होऊ शकतो. कारण आपण घराणेशाही मांडणारा पक्ष नाही आहे, एखाद्या नेत्याच्या मुलांनी पक्षात येण्यास आपल्या पक्षात ना नाही. मात्र पक्षावर कुणाचा अधिकार नाही. याच्यानंतर याला दिलंच पाहिजे, अशा प्रकारचा कुठलाही अधिकार भाजपामध्ये नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला मेहनतीच्या आधारावर पुढे यायचं आहे. आज अनेक लोकं आपल्या पक्षात त्या प्रकारे पुढे येताहेत. त्यामुळे  ज्या क्षणी आपण विचार सोडून आपण सत्तेच्या मागे लागू, त्यादिवशी भाजपाचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाVidhan Parishadविधान परिषदbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी